Breaking News

अमेरिका व्हिसा आणखी २५० डॉलरने महागलाः इंटिग्रिटी फी लागू व्हिसा जारी करणाऱ्यांना प्रत्येकाला लागू होणार

अमेरिकेने सर्व नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी एक नवीन अनिवार्य शुल्क लागू केले आहे, ज्याला व्हिसा इंटिग्रिटी फी म्हणून ओळखले जाते. १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षापासून, हे शुल्क प्रत्येक व्हिसा जारी करणाऱ्यांना लागू होईल, ज्यामध्ये F-१ आणि F-२ विद्यार्थी व्हिसा, J-१ आणि J-२ एक्सचेंज व्हिसा, H-१B आणि H-४ वर्क …

Read More »

जीएसटी कर संकलन १.८९ लाख कोटींवर पोहोचले, कर संकलन वाढले चार महिन्यात कर संलनात वाढ

भारताचे जीएसटी संकलन सप्टेंबरमध्ये ₹१.८९ लाख कोटींवर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ९.१% वाढले आहे, जे चार महिन्यांतील सर्वात वेगवान गती दर्शवते आणि दर कपातीपूर्वी ग्राहक खर्च कमी झाला असला तरी कर महसुलाची लवचिकता मजबूत करते. सप्टेंबरमध्ये सलग नववा महिना ₹१.८ लाख कोटींपेक्षा जास्त संकलन झाले, ज्यामध्ये नवीनतम वाढ ऑगस्टच्या …

Read More »

महात्मा गांधीजी आणि मानवता उपसंचालक प्रवीण टाके यांचा महात्मा गांधी जयंती निमित्त खास लेख

२ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कृतींमध्ये मानवतेचे मूर्त रूप आहे. ज्यामुळे त्यांचे जीवन हे केवळ राजकीय संघर्षाचे वर्णनच नाही, तर मानवतेच्या नात्याने केलेल्या अनेक प्रयोगांचे आणि त्यातून उमटलेल्या आदर्शांचा संग्रह आहे. दोन ऑक्टोबरला त्यांच्या …

Read More »

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार.. शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, खासगी लॅबना चाप लावण्यासाठी कायदा करणार बोगस औषधे शोधण्यासाठी खास यंत्रासह भरारी पथक

राज्यात आरोग्य चाचण्यांशी निगडित अनेक खासगी लॅब कार्यरत आहेत. मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी  कोणतीही संस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे या खासगी लॅबवर अंकुश ठेवण्यासाठी  विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात कायदा करणार  असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी येथे दिली. प्रकाश आबिटकर यांची माहिती म्हणाले, याशिवाय रूग्णांना जी औषधे मिळतात ती बोगस …

Read More »

दारूची दुकाने परमिटबार आदी सोडून सर्व दुकाने २४ तास खुली राहणार राज्य सरकारकडून नवा शासन निर्णय जारी

तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्णयानुसार मुंबईतील नाईट लाईफ सुरू ठेवण्यासाठी नव्या कायद्याची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी नव्या नियमानुसार २४ तास दुकाने खुली ठेवण्याची तरतूदही करण्यात आली होती. मात्र राज्यातील सरकार बदलले आणि हा नियम नव्या महायुतीच्या सरकारने कचऱ्याच्या डब्यात टाकला गेला. परंतु आता …

Read More »

सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

सणासुदीच्या काळात  अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन  विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ‘सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १ हजार ५९४ अन्न पेढ्यांची तपासणी करण्यात आली असून २ हजार ३६९ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखा बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय, राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा

बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार अनुकंपाचा अनुशेष संपणार ४ ऑक्टोबरला १०,३०९ नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यात ५१८७ अनुकंपा उमेदवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ४ ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी ५१२२ एमपीएससीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, एकाच दिवशी १०,३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या भाडेवाढ रद्दच्या निर्णयाची प्रताप सरनाईक यांच्याकडून अंमलबजावणी एसटीची १० टक्के भाडेवाड रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलात

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे …

Read More »