Breaking News

कोरोना: सततच्या वाढीनंतर रूग्णसंख्या ४ दिवसापूर्वीच्या संख्येवर नवे बाधित १६ हजार ४२९, १४ हजार ९२२ बरे होवून घरी तर ४२३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसापासून दर दिवसांगणिक बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. त्यामुळे राज्यात दुसरी लाट तर आली नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. मात्र आज पाचव्या दिवशी चार दिवसापूर्वीच्या संख्येइतकी अर्थात १६हजार ४२२ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ५९ …

Read More »

कोरोना चाचणी दरात ५०० ते ७०० रूपयाने कपात आरोग्य विभागाकडून निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाशी निगडीत वैद्यकिय साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने कोविड चाचणीसाठी आकरण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार ५०० ते ७०० रूपयांपर्यत कपात करण्यात आली. यासंबधीचा शासन निर्णय आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. नव्या निर्णयानुसार पूर्वी १९०० रूपये लागणाऱ्या कोरोना चाचणी दरात …

Read More »

ड्रग घेत असल्याची कबुली देणाऱ्या कंगणाचीही एनसीबीने स्वतःहून चौकशी करावी ! झाशीच्या राणीचा अपमान करणाऱ्या भाजपाने देशाची माफी मागावी आणि राम कदमवर कारवाई करा

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हीने स्वतःच ड्रग घेत असल्याची एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे. कंगणा मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगणाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …

Read More »

मुंबई महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने दिली वाय दर्जाची सुरक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली असून ही बाब धक्कादायक असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करत महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचीच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी …

Read More »

६ ते ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह विधान भवन प्रवेशाद्वारावरा २१०० जणांची तपासणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजात सहभाग घेणारे आमदार, मंत्री यांच्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि विधान भवनने घेतला. त्यानुसार ५ आणि ६ या दोन दिवसात २१०० जणांनी चाचणी केली. यापैकी ६१ जण बाधित आढळून आले असून यातील ६ ते ७ आमदार असल्याची …

Read More »

पुरवणी मागण्यात कर्जमाफी, जनआरोग्य योजना, औषध खरेदीसाठी दिला खास निधी २९ हजार कोटींच्या निधीत सहकार व पणन, सामाजिक न्याय आणि ग्रामविकास विभागाला प्राधान्य

मुंबई: विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय तरतूदीनुसार लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून पुरवणी मागण्या आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग, सहकार व पणन, सामाजिक न्याय विभाग आणि ग्रामविकास विभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. तर सामाजिक न्याय, आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागाला …

Read More »

या विधेयकावरून फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये झाली खडाजंगी हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवारांच्या उत्तराने झाले नाही समाधान

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासंदर्भातील विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधासभेत मांडले. मात्र त्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेत सध्या हे याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने त्याबाबतचे विधेयक सभागृहात मांडता येत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे …

Read More »

कोरोना : २ री लाट ? चढत्या क्रमाने संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराने वाढ २३ हजार ३५० नवे बाधित, ७ हजार ८२६ बरे झाले तर ३२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्साव काळ सुरू होईपर्यत नियंत्रणात येत असलेला कोरोना आता चांगलाच फैलावल्याचे दिसून येत असून कोरोनाची ही दुसरी लाट तर सुरु झालेली नाही ना ? अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांपासून दररोजच्या बाधित रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून आज सलग ४ थ्या दिवशी …

Read More »

मुख्यमंत्र्याचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली चिंता

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन …

Read More »

ठाकरे सरकार पावसाळी अधिवेशनात हे अध्यादेश आणि विधेयके मंजूर करणार ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मंजूरीसाठी विधिमंडळात ठेवणार

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे तिसरे अधिवेशनास उद्या सोमवारपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मांडण्यात येणार आहेत. यातील बहुतांष अध्यादेश हे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणूका कोरोनामुळे पुढे ढकलण्यासांदर्भात आहेत. तर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रम, जीएसटी आदींसंदर्भातील काही अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. याशिवाय राज्यातील जनतेच्या अनुषंगाने …

Read More »