मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांकरीता झालेल्या निवडणूकांत मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील एक जागा भाजपाकडे होती. मागील काही वर्षापासून या मतदारसंघातून …
Read More »गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर होणार ही कारवाई आरोग्य विभागाकडून इशारा
मुंबई: प्रतिनिधी राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी …
Read More »कोरोना: बाधित पुन्हा ९० हजारापेक्षा कमी, मृतकांची ३ अंकी संख्या कायम ५ हजार १८२ नवे बाधित, ८ हजार ६६ बरे झाले तर ११५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी ९० हजारापार झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत आज चांगलीच घट झाली असून ही संख्या तब्बल ५ हजाराने कमी झाल्याने ८५ हजार ५३५ वर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आली आहे. तर दुसऱ्याबाजूला ५ हजार १८५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ वर पोहोचली. …
Read More »महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून या सरकारला वेगवेगळ्या नावांनी पुकारले जात होते. मात्र हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत सरकारला पहिल्यांदाच धार्मिक अधिष्ठाण देण्याचा प्रयत्न केला. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या …
Read More »महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा …
Read More »धुळे-नंदुरबार वगळता ५ जांगावर आघाडीची आघाडी अमरीश पटेलांचा एकतर्फी विजय
मुंबई: प्रतिनिधी विधानपरिषदेच्या एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी तसेच ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान झाले. सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीत धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत भाजपाचे अमरीश पटेल हे विजयी झाले. तर बाकिच्या ५ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे संध्याकाळी दिसून आले. सुरूवातीला पुणे, औरंगाबाद, नागपूर …
Read More »चर्चेपासून पळ काढण्यापेक्षा दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांचे, अनेक समाजाच्या समस्या, मराठा समाजाच्या समस्यांवर चर्चा होणे आवश्यक असताना सरकार केवळ दोन दिवसाचे अधिवेशन घेवून अधिवेशनातील चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका करत दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याऐवजी दोन आठवड्यांचे घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत …
Read More »राज्य विधिमंडळाचे अधिवेशन या दोन दिवसांमध्ये होणार विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन ज्या पध्दतीने घेण्यात आले. त्याच पध्दतीने हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोनच दिवस चालणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली. या बैठकीला विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे …
Read More »कोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ ५ हजार ६०० नवे बाधित, ५ हजार २७ बरे झाले तर १११ मृतकांची संख्या
मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात दोन अंकी असलेल्या मृतकांच्या संख्येत आज तब्बल १० ते १५ च्या संख्येने वाढ झाली आहे. त्यामुळे आज १११ मृतकांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृतकांची संख्या ४७ हजार ३५७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संख्येतही आज वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६०० …
Read More »मराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध सामाजिक आणि राजकिय प्रश्नी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर डिसेंबर २०१९ पर्यंत तत्कालीन सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कोर्टाच्या आणि पोलिसी तुरुंगात अडकलेल्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. कोरेगांव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. त्यामुळे सलग राज्यातील काही …
Read More »
Marathi e-Batmya