नवी दिल्ली : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय …
Read More »कोरोना: बाधित रूग्णांची नवी सर्वोच्च संख्या, आटोक्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा वाढ १९ हजार २१८ नवे बाधित, १३ हजार २८९ बरे झाले तर ३७८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सव काळात राज्य सरकारने अनेक ठिकाणी नियमात सूट दिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांकडून शाररीक अंतर, मास्क वापरणे आदी गोष्टींना तिलांजली दिली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत असून काल १८ हजार बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल १९ हजार २१८ नवे बाधित रूग्ण आढळून आले. ही संख्या …
Read More »बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष दिले हे आदेश अडचणी तात्काळ दूर करून कालबद्ध रीतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले
मुंबई: प्रतिनिधी वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत निर्देश दिले असून वरळी येथे बीडीडी चाळीत ९६०० भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे …
Read More »अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभाध्यक्षच कोरोना पॉझिटीव्ह नाना पटोले यांनी ट्विट करत दिली माहिती
नागपूर-मुंबई : प्रतिनिधी दोन दिवसांनंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, आमदाराचे पीएपर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असलेल्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र आता दस्तुरखुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे च कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने त्या्ंच्या उपस्थितीशिवाय पावसाळी अधिवेशन होणार का? असा प्रश्न …
Read More »कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपाचे एक पाऊल मागे राम कदमांच्या चुकीची सारवासारव करण्यासाठी भाजपा नेते आशीष शेलार पुढे
मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला राजकिय पाठबळ देण्यासाठी भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुढाकार घेत तीचे वक्तव्य स्वत:च्या ट्विटवर रिट्विट करत समर्थन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोशल …
Read More »राज्यातील पोलिस बदल्यांना मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यत होणार राज्य सरकारकडून नव्याने आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी देण्यात आलेली मुदत उद्या संपत आलेली आहे. मात्र अद्यापही अनेक अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे बाकी असल्याने या बदल्यांसाठी आता सप्टेंबरच्या महिना अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेशही राज्य सरकारकडून जारी करण्यात आले. पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यां बदल्यासाठी ५ सप्टेंबर २०२० …
Read More »८ दशकानंतर महसूल रचनेत बदल : ७/१२ वर आता या गोष्टी नव्याने दिसणार युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य - महसूलमंत्री थोरात
मुंबई: प्रतिनिधी जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील …
Read More »कंगना टीम म्हणजे कंगना +भाजप आय टी सेल देवेंद्र फडणवीस आणि भाजपने महाराष्ट्राची विनाशर्त माफी मागावी- काँग्रेसची मागणी
मुंबई : प्रतिनिधी कंगना टीम म्हणजे “कंगना + भाजप आय टी सेल” असून कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भारतीय जनता पक्ष आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा आणि आमची मुंबईवरती प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. याबद्दल कंगना रानावतचे …
Read More »दोन सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती या दोघांची सेवा नियमित करणार का? कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल
मुंबई : प्रतिनिधी सेवाज्येष्ठतेनुसार महसूल केडरमधील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती देताना राज्य सरकारने दोन सेवानिवृत्त झालेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती दिल्याची माहिती पुढे आली असून आता या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील महसूल आणि मंत्रालय केडरमधील २३ अधिकाऱ्यांना २०१८ च्या सेवाज्येष्ठतेनुसार आयएएस …
Read More »अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनो या तारखेपासून परिक्षेची प्रक्रिया सुरु होणार राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न
मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची राजभवन येथे ऑनलाईन माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत १५ सप्टेंबरपासून परिक्षेची प्रक्रिया सुरु करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा …
Read More »
Marathi e-Batmya