राज्यातील पोलिस बदल्यांना मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यत होणार राज्य सरकारकडून नव्याने आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी देण्यात आलेली मुदत उद्या संपत आलेली आहे. मात्र अद्यापही अनेक अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे बाकी असल्याने या बदल्यांसाठी आता सप्टेंबरच्या महिना अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेशही राज्य सरकारकडून जारी करण्यात आले.

पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यां बदल्यासाठी ५ सप्टेंबर २०२० पर्यतची मुदत देण्यात आली होती. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील जवळपास ४९ प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या काल संध्याकाळपर्यत करण्यात आल्या. परंतु या अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरही काही अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे या बदल्यांसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंतची मुदत राज्य सरकारने दिली.

About Editor

Check Also

कुर्ला पश्चिमेच्या नौपाड्यात झाड कोसळून अंगावर पडल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू अंगावर झाड पडल्याने ६३ वर्षिय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रविवारी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला, जेव्हा एक झाड अंगावर कोसळल्याने एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *