Breaking News

राहुल गांधी यांचा टोला, शिक्षण मंत्री स्वतःला सोडून सगळ्यांना जबाबदार ठरवतायत पेपर लिक प्रकरणावरून राहुल गांधी आणि धर्मेद्र प्रधान यांच्यात रंगला सामना

सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, लाडका कंत्राटदारनंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना अनुभव नसलेल्या चड्डा या बिल्डरच्या घशात ४००

गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आरएसएस संविधान विरोधी बंदी हटविण्यावरून आरएसएसवर साधला निशाणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून स्वीकारतो का आणि त्यांना भारताचा राष्ट्रध्वज मान्य आहे का, ते भारतीय संविधानाशी एकनिष्ठ आहेत का? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएस RSS यांच्यावर निशाणा साधत विचारला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर …

Read More »

आरएसएसवरील बंदी केंद्राने हटविलीः जयराम रमेश म्हणाले, अर्ध्या चड्डीत येऊ शकतात १९६६ साली आरएसएसवर घातलेली बंदी ९ जुलै २०२४ रोजी हटविली

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्यांच्या कृत्य-कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास बंदी घालणारा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने नुकताच उठविला. मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी खोचक शब्दात टीका करत सरकारच्या निर्णयाची खिल्ली …

Read More »

आंतराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड मध्ये भारतीय विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी चार सुवर्ण, एक रौप्य पदकासह चवथ्या स्थानावर

भारतातील सहा सदस्यीय विद्यार्थी संघाने आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड (IMO) २०२४ मध्ये देशाला आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मिळवून दिली आहे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा भारतीय संघ चार सुवर्ण पदके, एक रौप्य पदक आणि एक सन्माननीय उल्लेख मिळवून जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आला आहे. बाथ, युनायटेड किंगडम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६५व्या IMO मध्ये. १९८९ …

Read More »

अमेरिकेने व्हिसासाठीच्या प्रक्रियेत केले हे बदल फि वाढीसह अनेक गोष्टीच्या नियम बदलले

अमेरिकेने अलीकडेच आपल्या व्हिसा अर्ज प्रक्रिया आणि कार्य अधिकृतता नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा आणल्या आहेत, जे १ एप्रिल २०२४ पासून लागू झाले आहेत. सुरक्षा वाढवण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. विदेशी नागरिकांसाठी अमेरिका हे नेहमीच आकर्षक ठिकाण राहिले आहे. जगभरातील अनेकांना यूएसमध्ये जाण्याची आणि करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी …

Read More »

रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पात सर्वाधिक निधीच्या तरतूदीची शक्यता २ ते २.५ लाख कोटी रूपयांच्या निधीची गरज

एआय-सक्षम मार्केट इंटेलिजन्स आणि इक्विटी मार्केट ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म, जार्विसने प्रसिद्ध केलेल्या ग्राउंडब्रेकिंग अंदाज अहवालात, आगामी रेल्वे बजेट वाटपातील महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी अनावरण करण्यात आली आहे. अहवालानुसार, सरकार भारतीय रेल्वेच्या विकासासाठी २ लाख कोटी रुपये ते २.२५ लाख कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. या भरीव वाटपाचे उद्दिष्ट पायाभूत सुविधांना बळ देणे, कनेक्टिव्हिटी …

Read More »

अग्निवीर योजनेतील जवान बटालीयनमध्ये चांगली कामगिरी बजावतायत लष्करातील अधिकाऱ्यांची माहिती

लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा यांनी रविवारी अग्निवीर योजनेचे अपडेट एका या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले की, अग्नीवीर योजना जी जून २०२२ मध्ये आणली गेली होती. योजनेअंतर्गत, पहिल्या तुकडीची डिसेंबर २०२२-जानेवारी २०२३ मध्ये भरती आणि नावनोंदणी झाली. पोनप्पा, सध्या ॲडज्युटंट जनरल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय लष्कराने सांगितले की, सुमारे …

Read More »

मध्य प्रदेशात रस्ते बांधणीला विरोध करणाऱ्या दोन महिलांना जीवंत पुरण्याचा प्रयत्न खाजगी जमिनीवर रस्ता बांधणीचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील दोन महिला या भागात रस्ता बांधकामाला विरोध करत असताना ट्रकमधून खडी-माती त्या महिलांच्या अंगावर तशीच टाकण्यात आली विशेष म्हणजे त्या महिलांचा विरोधात होत असतानाही संबधित ठेकेदाराना महिलांवरच खडी माती टाकल्याने त्या महिला माती आणि खडीच्या ढिगाऱ्यात अर्धवट पुरल्या गेल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदरची घटना शनिवारी …

Read More »

जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नये भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे. माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले …

Read More »