अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शासनाने आपतग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नांदेड, हिगोली जिल्हयात अनेक ठिकाणी अतीवृष्टी आणिपूरग्रस्त भागाच्या पाहणी नंतर केली. मागच्या तीन-चार दिवसात …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणी स्थापन केली समिती दोन निवृत्त महिला न्यायाधीशांसह माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती
बदलापूर येथील शाळेच्या दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्वत:च्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना ‘बेटा पढाओ और बेटी बचाओ’ असे म्हणत महाराष्ट्र सरकारने मुलांना योग्य आणि अयोग्य शिकवलेच पाहिजे, असा पुनरुच्चार करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने लहान वयातच मुलांना महिला आणि मुलींचा आदर …
Read More »मंत्रालयातील स्वेच्छानिवृत्तीनंतर सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा शिवसेना प्रवेश मेहकरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता
राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे असताना मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आता राजकारणाची वाट धरली आहे. मंत्रालयात ३ दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) या पदावर पोहोचलेले सिद्धार्थ खरात यांनी अलिकडेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर आज मंगळवारी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, जनसन्मान यात्रेचा तिसरा टप्पा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत पार
जनसन्मान यात्रेचा नुकताच दुसरा टप्पा संपला असून आता तिसरा टप्पा कधी घ्यायचा याच्या नियोजनावर चर्चा झाली. शिवाय महायुतीच्या नेत्यांची जी बैठक पार पडली त्याअनुषंगाने मतदारसंघनिहाय आढावा घेणे आणि त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले …
Read More »नाना पटोले यांची मागणी, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा, डीजीपी रश्मी शुल्कांना निलंबित करा बदलापूर प्रकणातील आपटे व महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटे अजून मोकाट कसे?
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर घटनेतील आरोपी आपटे व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले काय? असा …
Read More »एसटी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांचा संप; २०० डेपोतील एसटीच्या वाहतूकीला ब्रेक शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यावर तोडगा निघेपर्यंत संप सुरुच राहणार
राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यावरती अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीचे निमंत्रक मुकेश तिगोटे यांनी माहिती दिली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक दिल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सणासुदीच्या तोंडावर …
Read More »जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी जलसंपदा आणि सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि विविध सात ऊर्जा कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे ४० हजार ८७० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख १४ हजार कोटींची गुंतवणूक आणि ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे …
Read More »पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी, जन्मठेप शिक्षा तरतूदीचे अपराजिता विधेयक एकमताने मंजूर विशेष अधिवेशन बोलावित विधेयकाला एकमताने मंजूरी
काही दिवसांपूर्वी आर जी कार रूग्णालयात कामावर हजर असलेल्या महिला प्रशिक्षार्थी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले. तर भाजपाकडून अद्यापही सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभेने आज मंगळवारी ममता बॅनर्जी सरकारने आणलेले बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने …
Read More »ई गव्हर्नन्समुळे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’ योजनेची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असून सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होतो. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई-गव्हर्नन्समुळे थेट जमा होणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्सविषयक २७ …
Read More »व्ही अनंथा नागेश्वरन म्हणाले की, वाजवी पेक्षा आर्थिकीकरण होतेय सध्याच्या वित्तीय परिस्थितीवर सीआयआयच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले मत
भारताचे शेअर बाजार भांडवल जीडीपी GDP च्या १४० टक्क्यांवर पोहोचले आहे, तेव्हा हे स्वाभाविक आहे — परंतु वाजवी असणे आवश्यक नाही — की बाजाराचे विचार आणि प्राधान्य सार्वजनिक भाषणावर वर्चस्व गाजवते आणि धोरणात्मक भाषणावरही प्रभाव टाकतात, मुख्य आर्थिक सल्लागार ( CEA), व्ही अनंथा नागेश्वरन यांनी आज सांगितले. व्ही अनंथा नागेश्वरन …
Read More »
Marathi e-Batmya