जून महिन्यात शाकाहारी थाळीच्या किमतीत वाढ होत असताना घरी शिजवलेल्या चिकन थाळीची सरासरी किंमत कमी होत राहिली. जर तुम्हाला डाळीपेक्षा चिकनची चव जास्त आवडत असेल, तर पोल्ट्रीच्या किमती कमी झाल्यामुळे आणि टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तुम्ही मागील महिन्यात कमी पैसे दिले आहेत, असे क्रिसिलच्या फूड प्लेटच्या किंमतीचे …
Read More »रोबोटने केली आत्महत्या ? दक्षिण कोरियातील घटना
दक्षिण कोरियातील एका सिव्हिल सर्व्हंट रोबोटने कामाच्या प्रचंड दबावामुळे ‘आत्महत्या’ केल्याची माहिती आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, “अस्पष्ट कारणांमुळे” रोबोटने स्वतःला दोन मीटरच्या पायऱ्यांवरून खाली फेकले. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यादरम्यानच्या जिन्यात सर्व चिरडलेले आढळले. अहवालानुसार, रोबोटने केलेली ही पहिलीच आत्महत्या होती. साक्षीदारांच्या नजरेतून पाहता, रोबो एका जागी फिरत होता जणू …
Read More »अमृत भारत नॉन एसी रेल्वे गाड्यांचे उत्पादन सुरु १५० गाड्या सुरु करण्याचा मानस
दोन आधुनिक नॉन-एसी अमृत भारत गाड्या सुरू केल्यानंतर, भारतीय रेल्वेने विभागातील प्रवाशांना आराम मिळावा यासाठी अशा आणखी २०० गाड्यांचे उत्पादन सुरू केले आहे. एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अशा ५० गाड्यांचे उत्पादन आधीच प्रगतीपथावर आहे तर आणखी १५० गाड्या पाइपलाइनमध्ये आहेत. २२ डब्यांच्या अमृत भारत …
Read More »शासन दरापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही
तूर खरेदी साठी शासनाने दर निश्चित केला असून यापेक्षा कमी दरात तूर खरेदी करणा-यांवर कारवाई केल्या जाईल, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील तूर बाजारभावाने खरेदी करण्याबाबत सदस्य राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. हंगाम …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक विधानभवनात कर्णधार रोहित शर्मांसह सहकाऱ्यांचा विशेष सन्मान
भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली. तसेच भारतीय संघासाठी महाराष्ट्र …
Read More »बजाजची फ्रीडम १२५ ही जगातील पहिली सीएनजी इंटिग्रेटेड मोटरसायकल लाँच मोटरसायकलमध्ये ड्युअल-फ्युएल क्षमता असून २ लिटरची ऑक्झिलरी पेट्रोलची टाकी
बजाज ऑटो या जगातील सर्वात व्हॅल्यूएबल टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर कंपनीने ‘फ्रीडम’ या जगातील पहिल्या सीएनजी मोटरसायकलची घोषणा केली आहे! या ग्राउंड ब्रेकिंग इनोव्हेशनमुळे, पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक मोटरसायकलसाठी वाजवी खर्चातील व पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध होऊन टू-व्हीलरच्या उद्योगक्षेत्रात क्रांती घडून येणार आहे. इंधनाच्या खर्चात अतुलनीय बचत होऊन अधिक चांगले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य: …
Read More »अजित पवार यांचे जयंत पाटील यांना प्रत्युत्तर, “…येवढं लक्षात ठेवा…” कविता आणि शेरोशायरीतून प्रत्युत्तर देत सोबत येण्याची घातली साद
अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान जयंत पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर कवी विं दा करंदीकर यांच्या कवितेचा संदर्भ देत आणि शेरोशायरीतून यथेच्छ टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनीही शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनाही विं दा करंदीकर यांच्या कवितेतून प्रत्युत्तर देत शेरोशायरीतून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काही काळ …
Read More »१० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी; १५ दिवसात पीक विमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान माहिती
राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहिती, अंदाज घेण्यात येतो. महसूल मंडळ स्तरावरून ही केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत. १० हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय …
Read More »अजित पवार यांची अखेर कबुली, बाबा तुम्ही म्हणता तसे महाराष्ट्र … छोट्या राज्यांचा विचार केला तर तुम्ही म्हणता तेच बरोबर
मागील तीन दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरु आहे. विविध राजकिय पक्षांच्या आमदारांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेऊन अर्थसंकल्पातील तरतूदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विरोधकांच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याचे निरसन अजित पवार यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे …
Read More »अजित पवार यांचे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर, हा निर्धाराचा अर्थसंकल्प हा अजित दादाचा वादा जिल्हा विकास निधीतून प्रत्येक जिल्ह्याला ई-पिंक रिक्षा
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्यास आवश्यक निधी, …
Read More »
Marathi e-Batmya