मुंबई

अपात्र धारावीकरांचे पुर्नवसन कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेवर होणार धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणा

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मदर डेअरी अर्थात मातृदुग्धशाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १४ जून २०२४ च्या …

Read More »

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदतीत वाढ ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदत- शालेय शिक्षण विभागाची माहिती

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ हा कालावधी देण्यात आला होता. ६ मे २०२५ च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने ३१ मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन तात्काळ मागे घ्या, थेट जनसुनावणी घ्या सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता एमआरटीपी MRTP चे उल्लंघन

भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …

Read More »

नितेश राणे यांचे निर्देश, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान वॉटर टॅक्सी सुरु करण्याबाबत आदेश

गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न …

Read More »

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ११४४ कोटींच्या योजनांचा आढावा आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत २०२४-२५ च्या योजनांची अंमलबजावणी, खर्चाचे विश्लेषण तसेच २०२५-२६ च्या नव्या योजनांची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर कामांसाठी उपलब्ध असलेल्या ₹१०८८.७७ कोटींपैकी ९९.८ टक्के म्हणजेच ₹१०८६.७५ कोटी …

Read More »

आशिष शेलार यांचे आदेश, सर्व यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करा मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीत दिले प्रशासनाला आदेश

जिल्हा नियोजन समिती ही एक महत्त्वाची समिती असून या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हे जनतेच्या हिताचे असतात. तसेच शासनाचा निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याची जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणांवर असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी या बैठकीमध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच अधिकारी वर्गाने प्रयत्न …

Read More »

मुंबई पोलिसांना मिळणार डिजिटल ओळखपत्र बनावट ओळखपत्रांद्वारे डिजिटल अटकेच्या घटनांमध्ये वाढ

पोलीस भरती

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयात काम करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता डिजिटल स्मार्ट ओळखपत्रे देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला असून यासंदर्भात गृह विभागाने शासन निर्णय जारी करत प्रशासकीय मान्यता दिली. गुरुवारी जारी केलेल्या सरकारी आदेशात ही घोषणा करण्यात आली. डिजिटल स्मार्ट ओळखपत्रे बनवण्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य …

Read More »

११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व सहायता केंद्राचीही

इयत्ता ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५, सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण संचालक तथा अध्यक्ष, राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समिती (माध्यमिक व …

Read More »

मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची उडाली दैना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यातील मान्सूनने काढली हवा

मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर एकाच दिवसात मान्सूनचे पदार्पण महाराष्ट्रात झाले. पण मान्सूनच्या पावसाला मुंबईत पोहोचायला तीन दिवस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण तत्पूर्वीच कोकणात आलेल्या पावसाने मुंबईत रात्रीत आगमन करत रात्रभर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मान्सूनने चांगलीच हजेरी लावत कोसळायला सुरुवात …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …

Read More »