मुंबई: प्रतिनिधी बांद्रा ते दहिसर येथील कार्यक्षेत्रात काही संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. सदर अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेवू नये असे आवाहन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, पश्चिम विभाग यांनी केले आहे. अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे : अ.क्र. वार्ड शाळा नाव व पत्ता …
Read More »दुषित भाज्यांची विक्री रोखण्यासाठी शेतकरी केंद्रे सुरू महापालिकेला केंद्रे सुरु करण्याबाबत सूचना करण्याचे नगरविकास राज्यमंत्र्याचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी शहरातील अनधिकृत फेरिवाल्यांद्वारे दुषित भाज्यांची विक्री केली जात असल्याप्रकरणी सांताक्रुज येथील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुषित भाज्यांच्या विक्रीला चाप बसून नागरिकांना चांगल्या दर्जाची भाजी मिळावी यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या सुचनेनुसार शेतकरी केंद्रे सुरू करण्याच्या सुचना मुंबई महापालिकेला केली जाणार असल्याचे आश्वासनही नगरविकास राज्यमंत्री …
Read More »बस, लोकल रेल्वे, मोनोचा प्रवास आता एकाच तिकिटावर एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात कामाच्या निमित्ताने बस, लोकल रेल्वे आणि मोनोने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना वेगवेगळे तिकिट काढावे लागते. त्यात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ जात असल्याने या सर्व वाहतूक व्यवस्थेचे एकाच कार्डावर तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी एकात्मिक तिकिट …
Read More »ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकण व नाशिक मधील शेती, फळपिकांचे आणि मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले. या वादळचा फटका ८ हजार ४५ शेतकरी व मच्छिमारांना बसला. त्या सर्वांना ६ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून हा निधी थेट नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करावा असे आदेश नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांना मदत …
Read More »शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांचा उद्या मंत्रालयावर महामोर्चा ९१ शिक्षक संघटनांसह २ लाख कर्मचारी सहभागी होणार
मुंबई : प्रतिनिधी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांची दाद मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंत्रालयावर उद्या गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात राज्यातील शासकिय कर्मचाऱ्यांबरोबरच निमशासकिय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे तब्बल २ लाख कर्मचारी सहभागी होणार असून शिक्षकांच्या ९१ संघटनांनी पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होणार असल्याची …
Read More »ठाण्यात बिर्याणी फेस्टीवल शुक्रवारपासून होणार सुरूवात : सोबत लाईव्ह मुझिक आणि गजलची मेजवानी
ठाणे : प्रतिनिधी ठाण्यात २३ ते २५ फेब्रुवारी असे तीन दिवसीय बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंन्टस व टॅग या ठाण्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या संस्थेच्यावतीने बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून खवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणार आहे. दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी अशा …
Read More »शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या वरद हस्तामुळे एमसीएने थकविले १३ कोटी ६२ महिन्यापासून पोलिसांकडून प्रयत्न, मात्र पदरात छदामही नाही
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण आणि विविध प्रश्नी राज्य सरकारकडे धाव घेणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या ६२ महिन्यापासून मुंबई पोलिस दलाचे १३ कोटी ४२ लाख रूपये थकविले आहेत. या दोन्ही राजकिय नेत्यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएवर वरदहस्त …
Read More »पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु असून २०२२ पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त करत राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल वाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत आहे. यामुळे देशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. …
Read More »मुंबईत रेल्वे विकासाची ६५ हजार कोटींची कामे सुरु तर महाराष्ट्रात ७० हजार कोटींची रेल्वे विकासाची कामे
नवी दिल्ली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील रेल्वे विकासाच्या विविध प्रकल्पांसाठी १ लाख ३५ हजार ५७ कोटी रुपयांची कामे गेल्या चार वर्षात हाती घेण्यात आली आहेत. यातील सर्वाधिक कामे एकट्या मुंबईत रेल्वे विकासासाठी ६५ हजार ७२४ कोटी रुपयांची कामे ही एम.यू.टी. पी. अंतर्गत करण्यात येत आहेत. या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग, दुपदरीकरण, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण याबरोबरच …
Read More »म्हणे उद्योगपतींनी काय कँमेरेवाल्यांची पाठ पहायची का? मँग्नेटीक महाराष्ट्र उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फक्त दूरदर्शन, एएनआयवरच
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र कन्वर्जन्स-२०१८ चे उद्घाटन उद्या रविवारी १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावरील उद्योगपती हजर राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाला खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना परवानगी …
Read More »
Marathi e-Batmya