मुंबई

अतिवृष्टीमुळे गैरहजर उमेदवारांकरिता १३ जुलैला टंकलेखन कौशल्य चाचणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ८ जुलै २०२४ रोजी आयोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आता १३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ८ जुलै, २०२४ रोजी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनांवर परिणाम झाला होता. परिणामी या दिवशी चाचणीसाठी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्या वांद्र वर्सोवा कोस्टल रोडप्रकरणी आयोजित बैठकीत दिले निर्देश

वांद्रे – वर्सोवा कोस्टल रोडच्या कामामध्ये एक कनेक्टर गजधर बांध, सांताक्रूझ पश्चिम या ठिकाणी येणार आहे. हा कनेक्टर जेथे उतरणार आहे तेथील पुलाच्या खालील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना नागरिकांना समस्या जाणवणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे वांद्रे क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

Hit And Run worli: मिहिर शहाला पोलिस कोठडी, तर राजेश शहाची उपनेतेपदावरून हकालपट्टी शिवसेना शिंदे गटाचा निर्णयः मिहिर ६० तासानंतर पोलिसांच्या ताब्यात

भल्या पहाटे आपल्या रोजगाराच्या निमित्ताने मुंबईतील वरळीतील आपल्या घराकडे विक्रीसाठी बाहेर पडलेल्या नाकाव कुटुंबियांच्या दुचाकीला शिवसेना शिंदे गटाच्या उपनेते राहिलेल्या राजेश शहा याच्या मुलाने मिहिर शहाने धडक दिली. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी अर्थात काल संध्याकाळी अखेर मिहिर शहाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज दुपारी शिंदे गटाचे …

Read More »

मुंबईतील या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्री दादाजी भुसे यांनी मांडला ठराव

विधानसभा निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना जाहिर करण्याची घाई करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहिर करण्यात आली. त्याच धर्तीवर आता मराठी भाषेच्या मुद्यांवरून पुन्हा एकदा मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य …

Read More »

mumbai rain: मध्य रेल्वेची लोकल आता कल्याणच्या पुढे वाहतूक सुरु रेल्वे विभागाकडून माहिती जाहिर

मुंबईत पहाटेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत जवळपास ३०० मिलीपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्याने मुंबई आणि उपनगरीय वाहतूकीच्या स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे कल्याण स्थानकाच्या पुढे रेल्वे वाहतूक होत नव्हती. तसेच ठाणे ते सीएसएमटी दरम्यान सुरु असलेली रेल्वे सेवाही अत्यंत धीम्या पध्दतीने विस्कळीत पध्दतीने सुरु होती. मात्र पावसाने काहीशी उघडीप दिल्याने दुपारनंतर …

Read More »

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबईत रात्री मोठा पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. काल रात्री मोठा पाऊस झाल्याने मुंबईतील …

Read More »

mumbai rain: मध्य रेल्वेने जारी केले मेल-एक्सप्रेसचे रिशेड्युल अनेक मेल-एक्सप्रेस दुपारी २ नंतर धावणार

मध्यरात्रीनंतर मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्या. तर अनेक ठिकाणी रस्ते महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. मात्र पावसाच्या अंदाजाची माहिती किंवा कल्पना न आल्याने यापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्याचे आरक्षण केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे …

Read More »

mumbai rain: मुंबईतील जनजीवन विस्कळीतः लोकल, रेल्वे पुर्वपदावर नाही ३०० मिमी पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, अद्याप पाणी पूर्ण ओसारायला तयार नाही

मध्यरात्रीनंतर उशीराने सुरु झालेल्या मुसळधार पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत राहिला. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला. सकाळचे ११ वाजले तरी साचलेले पाणी कमी व्हायला तयार नव्हते. यामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याने अनेक चाकरमानी वेळेवर घराच्या बाहेर …

Read More »

डॉ आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा स्थापनादिन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहणार

महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब दलित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ७९ वा वर्धापन दिन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला …

Read More »

शिंदे गटाच्या राजेश शहाच्या मुलाचा प्रतापः बीएमडब्लू कारने महिलेचे प्राण घेऊन फरार पोलिसांकडून शोधाशोध सुरु केल्याची माहिती

पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर पैसेवाल्या आणि सत्तेची धुंदी चढलेल्या नेत्यांच्या पोरांच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाच्या हिट अॅण्ड रन या घटनेची भर पडली आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या पोराने मुंबई वरळी येथील एका मच्छिमार महिलेला धडक तर दिली. पण नंतर सदर महिलेच्या …

Read More »