राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आवाहन नवलेखकांनो अर्ज पाठवा ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत साहित्य पाठविण्याचा कालावधी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन २०२५ या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवलेखकांनी १ ते ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

या सहा वाङ्मय प्रकाराला मिळणार अनुदान

(1) कविता (६४ ते ९६ मुद्रीत केलेली पृष्ठे ८० कविता)

(2) कथा (१२८ ते १४४ मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त ४५००० शब्द

(3) नाटक/एकांकिका (६४ ते ९६ मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त २८००० शब्द)

(4) कादंबरी (१२८ ते १४४ मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त ४५००० शब्द)

(5) बालवाङ्मय (६४ ते ९६ मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त २८,०००)

(6) वैचारिक लेख, ललितलेख, चरित्र, आत्मकथन, प्रवास वर्णन (१२८ ते १४४ मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त ४५००० शब्द)

या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकुराला अनुदान देण्यात येईल. नमूद केलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही.

या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना २०२५ माहितीपत्रक व अर्ज’ या शीर्षाखाली तसेच ‘What’s new’ या अंतर्गत ‘Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form’ या शीर्षकाखाली तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. दूरध्वनी क्र. 2432 5931 यावर संपर्क साधावा.

About Editor

Check Also

भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन कोस्टल रोडने प्रवास करताना जय हो गाणे ऐकायला मिळणार

मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी  रस्त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *