डॉ अशोक वुईके म्हणाले की, आदिवासी समाजाचा इतिहास व संस्कृतीच्या जतनासाठी संशोधनाची गरज आदिवासी अध्ययन व संशोधन उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन

आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सखोल संशोधन आणि अध्ययनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक वुईके यांनी केले.

मुंबई विद्यापीठातील आदिवासी अध्ययन व संशोधन उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक वुईके यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘आदिवासी अस्मिता’ आणि त्यांचे ‘सांस्कृतिक महत्त्व’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान, प्रा. शामराव कोरेटी, अतुल जोग उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्य यावर सखोल अभ्यास करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आदिवासी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेचा अभ्यास करण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सन २०२४-२५ हे वर्ष “जनजाती गौरव वर्ष” साजरे करण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे आदिवासी समाजासाठी जल, जमीन आणि जंगलाच्या हक्कांसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. त्यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी माहितीपर पुस्तिका वितरित करण्यात येणार आहेत. निसर्गपूजक आदिवासी समाजाने आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि जीवनमूल्यांच्या माध्यमातून पर्यावरणाशी सुसंवाद साधत जीवन जगण्याची अद्वितीय परंपरा निर्माण केली आहे. या परंपरेचे संवर्धन आणि प्रसारासाठी शास्त्रशुद्ध संशोधनाची आवश्यकता असल्याचेही सांगितले.

यावेळी प्रा रवींद्र कुलकर्णी, हर्ष चव्हाण, अतुल जोग यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रकाश मसराम यांनी केले तर आभार डॉ. विनोद कुमारे यांनी मानले.

About Editor

Check Also

उपमुख्यमत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा सखोल चौकशी करण्याचे प्रशासनाला आदेश

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *