Tag Archives: minister

वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांची माहिती

राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. …

Read More »

अतुल सावे यांची माहिती, ‘महाज्योती’ आता यशाचा ‘ब्रँड’ · ‘महाज्योती’च्या गुणवंतांचे युपीएससी निकालात ‘शतक’ · भारतीय वन सेवा परीक्षेत आठ विद्यार्थ्यांची बाजी ·'महाज्योती'च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम

युपीएससी वन सेवा परीक्षेत ‘महाज्योती’च्या आठ विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि संस्थेने ओलांडलेला यशाचा ऐतिहासिक ‘शतकीय’ टप्पा, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून ‘महाज्योती’ आता केवळ एक प्रशिक्षण संस्था उरली नसून, ती ग्रामीण भागातील गुणवंतांना प्रशासनात हक्काचे स्थान मिळवून देणारा एक सक्षम ‘ब्रँड’ बनली आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले. पुढे …

Read More »

संजय शिरसाट यांची चौकशीची मागणी, निदा खानला एमआयएमचा आसरा इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांची चौकशी करावी

नाशिकमधील बहुचर्चित असलेले टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला काल रात्री छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली. तिला एमआयएमच्या नगरसेवकाने आसरा दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांची चौकशी करावी अशी मागणी केली. मंत्री संजय …

Read More »

नितेश राणे यांचे निर्देश, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा उभाराव्या जहाजबांधणी उद्योगासाठी स्थळ निवडीच्या प्रक्रियेला वेग

राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक आढावा घेण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यास प्राधान्य देत संबंधित स्थळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, पुनर्भरण, ट्रॅफिक लाँचिंग तसेच सागरी पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जहाजबांधणी उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या …

Read More »

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने १५ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत कार्यरत …

Read More »

मंत्री अतुल सावे यांची माहिती, भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या अत्याचार प्रतिबंध व तक्रार निवारणावर भर

राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावर समित्यांच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘विकसित महाराष्ट्र’ साठी ठोस कृती आराखडा प्रादेशिक तफावत कमी करण्यावर भर

प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यावर भर देऊन सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ व्हिजन मॅनेजमेंट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेत पुढील टप्प्यात प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष …

Read More »

अवकाळीच्या संकटातून सावरण्यासाठी ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांची मदत मंजूर राज्यातील ६६ हजारांहून अधिक शेतकरी बाधित

राज्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेती, घरे व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेत ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांच्या मदतीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबत माहिती देताना, या निर्णयामुळे राज्यातील …

Read More »

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी आजार आणि मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना- गिरिश महाजन

राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक मानक कार्यपद्धती (SOPs) जारी केल्या आहेत. उष्णता-संबंधित आजार व मृत्यू कमी करण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरणार असून, विशेषतः अनौपचारिक कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, डॉ आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो …

Read More »