लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध …
Read More »छगन भुजबळ यांची माहिती, पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी मे महिन्यात नेहमीपेक्षा २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना छगन …
Read More »नितेश राणे यांची माहिती, जलवाहतूक सेवा होणार डिजिटल ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार
मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्सोवा-मढ पारंपरिक तिकीट प्रणाली आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश मधील प्रवासी जलवाहतूकीसाठी ऑनलाईन तिकीट वितरण, विक्री प्रणाली सुरु करणेबाबत आढावा बैठक …
Read More »आशिष शेलार यांचे आदेश, कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच त्यावर आधारित कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क आणि …
Read More »मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश, नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा आढावा
राज्यातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. कोकण-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी तसेच कोकण-गोदावरी वळण योजना या नदीजोड प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा …
Read More »वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांची माहिती
राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. …
Read More »अतुल सावे यांची माहिती, ‘महाज्योती’ आता यशाचा ‘ब्रँड’ · ‘महाज्योती’च्या गुणवंतांचे युपीएससी निकालात ‘शतक’ · भारतीय वन सेवा परीक्षेत आठ विद्यार्थ्यांची बाजी ·'महाज्योती'च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम
युपीएससी वन सेवा परीक्षेत ‘महाज्योती’च्या आठ विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि संस्थेने ओलांडलेला यशाचा ऐतिहासिक ‘शतकीय’ टप्पा, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून ‘महाज्योती’ आता केवळ एक प्रशिक्षण संस्था उरली नसून, ती ग्रामीण भागातील गुणवंतांना प्रशासनात हक्काचे स्थान मिळवून देणारा एक सक्षम ‘ब्रँड’ बनली आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले. पुढे …
Read More »संजय शिरसाट यांची चौकशीची मागणी, निदा खानला एमआयएमचा आसरा इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांची चौकशी करावी
नाशिकमधील बहुचर्चित असलेले टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला काल रात्री छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली. तिला एमआयएमच्या नगरसेवकाने आसरा दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांची चौकशी करावी अशी मागणी केली. मंत्री संजय …
Read More »पशुसंवर्धन सेवेतील ३१०३ अधिकारी पदांसाठी ११ जूनला परीक्षा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश
राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी या पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’च्या २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’च्या ३०८ पदांसाठी संगणक …
Read More »मंत्री अतुल सावे यांची माहिती, भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या अत्याचार प्रतिबंध व तक्रार निवारणावर भर
राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावर समित्यांच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे …
Read More »
Marathi e-Batmya