राजकारण

त्या चर्चेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, पाटील काय चीज आहे माहित नाही ४२ वर्षे झाली राजकारणात थोडी नाहीत

पुणे: प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर गेले की त्यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चेला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषेदेला सामोरे जाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्या सूत्रांच हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना …

Read More »

राज्याची जगासमोर प्रतिमा पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आज दोन वर्षे झाली. दोन वर्षाच्या सरकारच्या कालावधीचे वर्णन करायचे झाले तर आघाडी सरकार फक्त “पुत्र, पुत्री आणि पुतण्या” याभोवतीच फिरणारं असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. आघाडी सरकारच्या दोन वर्षा निमित्ताने आज प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपा नेते …

Read More »

आम्ही मोदींचे शिष्य, फेसबुक-ट्विटर कसे वापराचे हे त्यांच्याकडूनच शिकलो पवारसाहेबांचा फोटो मॉर्प करणार्‍या भाजपचा फर्जीवाडा समोर आणलाय - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी चीन संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला शरद पवारसाहेब आणि प्रफुल पटेल दिल्लीत गेले असताना पवारसाहेबांचा एक फोटो मॉर्प करुन भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध करुन जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्यांचा हा फर्जीवाडा समोर आणल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त अजित पवार म्हणाले… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जनतेचे आभार

मुंबई : प्रतिनिधी “महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. नागरिकांमध्ये एकता, …

Read More »

आगामी वर्षापासून शाळांमध्ये द्विभाषिक अभ्यासक्रम लागू इंग्रजीतील दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत -प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक तत्वे जारी, अन्यथा दंड सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

 मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी …

Read More »

निवडणूक प्राधिकरणाकडून २७ हजार सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर पहिल्या टप्प्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार

पुणे: प्रतिनिधी राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. कोविड-19 परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणूका …

Read More »

पटोले केंद्रीय मंत्री राणेंना म्हणाले, नवीन कुडमुडे ज्योतिष्यी… भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार!: नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना …

Read More »

परमबीर सिंग चांदिवाल आयोगासमोर हजर राहणार ठाणे, एस्पप्लेंनेंड न्यायालयासमोर हजेरी

मुंबईः प्रतिनिधी तब्बल २५० दिवसाहून अधिक काळ गायब झालेले परमबीर सिंग यांनी काल हजेरी लावत ठाणे गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ठाणे न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या विरोधात पुन्हा न्यायालयात हजर होत सदरचे वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यावर ठाणे न्यायालयाने त्यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केल्यानंतर त्यांनी …

Read More »

सुरक्षा यंत्रणा सरकारच्या वेठीला, मुंबईकर वाऱ्यावर ! सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम ठाकरे सरकारने रखडवली-भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी खंडणीखोरी, भ्रष्टाचार आणि मंत्र्यांच्या सरबराईसाठी ठाकरे सरकारने पोलीस यंत्रणेस वेठीस धरल्याने राज्यातील जनतेची सुरक्षा संकटात सापडली आहे. दहशतवादी कारवायांचे अनेक कट केंद्रीय यंत्रणांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येऊनही, सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात मात्र ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही राजकीय द्वेषातून …

Read More »