मुंबई प्रतिनिधी परमवीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगून टाकले, त्यामुळे पहिल्या दिवसापासून परमबीर सिंह व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचा माझा आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला असल्याचा दावा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर …
Read More »शिक्षण मंत्री गायकवाड यांची घोषणा, शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार शाळा १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार
मुंबईः प्रतिनिधी पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू (School reopen) करणार असल्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं …
Read More »यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतः समितीची बैठक २९ ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरला यावरून उलट सुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईतच होणार असून या त्यासंदर्भातील तारखा निश्चित करण्यासाठी संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक २९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांनी लावली रूग्णालयातून हजेरी ऑनलाईन पध्दतीने बैठकीस हजर रहात दिले धन्यवाद
मुंबई : प्रतिनिधी आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात …
Read More »भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भडकाविले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारची होती. परंतु भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब …
Read More »एसटी संपः खोत-पडळकरांकडून तुर्तास माघार, मात्र कर्मचाऱ्यांचा नकार विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी तुर्तास मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र राज्यात कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संप आंदोलनाबाबत कामगारांनी निर्णय घ्यावा असे आणि तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका या दोघांनी जाहीर केली. काल …
Read More »मविआ नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते राकेश टिकैत, हनन मुल्लांचा मुंबईत मेळावा कॉ.प्रकाश रेड्डी नाना पटोले, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येतात भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते, त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ, मात्र संप मागे घेण्याबाबत शिष्टमंडळाकडून अवधी कामावर हजर होणाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द- एसटी अध्यक्ष अनिल परब यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी काल रात्री आणि आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ आणि एसटी अध्यक्ष अनिल परब यांच्यात बैठकांचे सत्र पार पडल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करत असल्याचे जाहीर करत दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार होईल याची हमी राज्य सरकारने घेतल्याचे सांगत एसटी कामगारांनी तात्काळ कामावर हजर व्हावे असे …
Read More »काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्याबाबत केली ही मागणी कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना ४ लाखाचे भरपाई द्या
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जवळपास दिड लाख नागरीकांचा मृत्यू झाला. तर संपूर्ण देशभरात लाखो नागरीकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केलेले असतानाही केंद्र सरकारने या आजारामुळे मृत्यू पडलेल्यांसाठी केवळ ५० हजार रूपयांची तुटपुंजी रक्कम देण्याचे जाहिर केले. मात्र ही रक्कम फारच …
Read More »मंत्री परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांशी सकारात्मक चर्चा, नवा प्रस्ताव दिला कर्मचाऱ्यांबरोबर पहिल्यांदा सकारात्मक चर्चा, काय झाली चर्चा
मुंबईः प्रतिनिधी १५ दिवसाहून अधिक काळ आपल्या विविध मागण्यांसह राज्य सरकारमध्ये विलीनकरण करण्याच्या मुख्य मागणीप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून समितीचा निर्णय होईपर्यत पगारात अंतरिम वाढ देण्याचा नवा प्रस्ताव कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी …
Read More »
Marathi e-Batmya