राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का? सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन ‘जेम्स अँड ज्वेलरी’ अभ्यासक्रम सुरू करणार जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन

‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात विश्व स्तरावर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता आहे. यासाठी राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठ अंतर्गत ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल. ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, मोदी माझे शत्रु नाहीत पण ते मला मानत असतील मनसे-शिवसेना उबाठा दरम्यानची युती लवकरच जाहिर करणार

मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच आता आता एकत्र आलोय तर सोबत राहण्यासाठी अशी घोषणाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी घेत शुभेच्छा दिल्या. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको – ‘एनएमआरडीए’मध्ये सामंजस्य करार कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प

नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी (ता.कामठी) या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ (ईको टुरिझम) विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजनको) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड या …

Read More »

रविंद्र चव्हाण यांची माहिती, नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, शेतकरी वर्ग अस्वस्थ, मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची महाराष्ट्रातील शेतकरी संकटात; राष्ट्रवादी काँग्रेसचा नाशिकमध्ये 'आक्रोश मोर्चा'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेती पिकांच्या नुकसानीचा मुद्दा आणि शेतकरी आत्महत्ये प्रश्नावरून राज्य सरकारचे लक्ष्य वेधले. तसेच या प्रश्नावरून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवरही शरद पवार यांनी …

Read More »

शासकीय जागेवर जाहिरात फलकांसाठी ई-लिलाव महसूल वाढीसाठी शासनाचा निर्णय

राज्यातील शासनाच्या जागांवर जाहिरात फलक लावण्यासाठी ई- लिलाव प्रक्रिया राबविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. पाच वर्षासाठी या जागा वापरासाठी दिल्या जातील. प्रति निविदा प्रक्रिया पाच हजार रुपयांचे शुल्क याकरिता आकारले जाईल. तर महापालिका क्षेत्रातील जमिनीच्या बाजारभावानुसार ३ पट तर जिल्हा किंवा राष्ट्रीय महामार्गाकरिता ५ पट दर आकारला जाणार आहे. महसूल …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार …

Read More »

राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय पंतप्रधान मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा (प्रॉफीट) हा फक्त अंबानीला होतोय. …

Read More »