राजकारण

स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व …

Read More »

प्रचार थंडावला… शेवट दिवशी भाजपा, राष्ट्रवादी,काँग्रेस, मनसेकडून प्रचारात आघाडी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीकरीता ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता संपला. मागील २० ते २५ दिवस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने चांगलाच राजकिय धुराळा उडवून दिला. मात्र खऱ्या लढतीचे चित्र भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असेच प्रचारात दिसून आले. भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

वरळीतून माघार घे, वंचितच्या उमेदवाराला शिवसेनेकडून धमकी देत २ कोटींची ऑफर पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडे वंचितची तक्रार

मुंबईः प्रतिनिधी संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा निर्विवाद विजय व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांना २ कोटी रूपयांची ऑफर देत उमेदवारी मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप उमेदवार गौतम …

Read More »

‘भाजपाचा राम’ शिल्लक राहिला नाही अशी वर्तमानपत्रांची हेडलाईन असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

कर्जत जामखेडः प्रतिनिधी कर्जत- जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाईन २४ तारीखला वर्तमानपत्रांची असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जतच्या जाहीर सभेत व्यक्त केला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

आदिवासींच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे प्रतिपादन

नवापूरः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने आजवर आदिवासीचा वापर फक्त मतांसाठी केला. गेल्या पाच वर्षांत आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. आदिवासींचा विकास करण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे झालेल्या …

Read More »

तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही चितपट कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांची फळी तयार केलीय- शरद पवारांचा टोला

पंढरपूरः प्रतिनिधी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्याविरोधी कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्या विरोधात जो बोलतो त्यावर ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार …

Read More »

भारतातील मुलांपेक्षा नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तानातील मुलांना चांगले अन्न मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नाशिक – निफाडः प्रतिनिधी या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत. त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी प्रतीचे अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं, ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील …

Read More »

शिवसेना-भाजपाच्या प्रचारातून केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब? दक्षिण मुंबईतील सेना-भाजपाच्या उमेदवारांच्या जाहीरात फलकात फोटो दिसेना

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे शिवसेना-भाजपा उमेदवारांच्या प्रचारातून गायब झाले आहेत. तसेच युतीच्या उमेदवारांच्या कोणत्याच फलक आणि जाहीरातीमध्ये त्यांचा फोटो वापरला जात नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. केंद्रात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. तसेच …

Read More »

१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतरही काही करता येणार नसेल तर बांगड्या भरा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

श्रीगोंदाः प्रतिनिधी १३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर त्यांनी एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत अशा शब्दात शरद पवार यांनी टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचारार्थ जाहीर सभेत ते श्रीगोंदा येथे बोलत होते. काय करायचं आता… काही कामच नाही म्हणतात… …

Read More »

मतदारांना पैसे वाटल्याची कबुली देणा-या मंत्री लोणीकरांची उमेदवारी रद्द करा काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्राचे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले. तसेच मते मिळवण्यासाठी ते विशिष्ट जातीचा उल्लेख करत आहेत. यावरून निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत असल्याचे …

Read More »