मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध बोर्डाच्या अर्थात एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं असून तशी कायद्यात योग्य तो बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. …
Read More »पुलवामा, बालाकोट हल्ल्यातील शहीदांना आदरांजली पण त्यांचे प्रश्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला …
Read More »अर्थसंकल्प फुटीची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याऐवजी तो बाहेर अगोदरच फुटलेला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला परंतु त्याची माहिती अगोदरच बाहेर पडली. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यावर …
Read More »अखेर नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात ४० गावांच्या ग्रामस्थांची पसंती
मुंबईः प्रतिनिधी बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन येथील ४० गावातील जमिन अधिग्रहण करण्यासाठी या गावांच्या ग्रामस्थांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात होणारा हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार आहे. याबाबत विधानसभेत लेखी प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मुख्यमंत्र्याना पाहताच विरोधक म्हणतात आले रे आले चोरटे आले विधासभेत आणि पायऱ्यावर विरोधक आणि मुख्यमंत्री यांच्यात पहिल्याच दिवशी सामना
मुंबईः प्रतिनिधी आले रे आले चोरटे आले असं म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पाहण्यास मिळाला. गेली साडेचार वर्षे जे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी बाकांवर बसले होते ते आता भाजपा सरकारचे मंत्री म्हणून समोर आले. कारण त्यांनी भाजपात प्रवेश केला …
Read More »सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय फडणवीस सरकार म्हणजे 'आभासी' सरकार - धनंजय मुंडे
मुंबईः प्रतिनिधी या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार असल्याचा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या …
Read More »मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र
मुंबई: प्रतिनिधी भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांची या मंत्र्यांवर …
Read More »बडोले, सवरा,महेतांची कामगिरी खराब म्हणून नाही काढले दलित, आदीवासी मंत्र्यांच्या गच्छंतीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव
मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना १३ मंत्र्यांचा नव्याने समावेश करतानाच विद्यमान ३ मंत्री ३ राज्यमंत्र्यांची गच्छंती करण्यात आली. परंतु राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश महेता, राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रविण पोटे-पाटील आणि अम्बरीष आत्राम यांची कामगिरी खराब असल्याने काढले नाही. तर त्यांची कामगिरी चांगलीच असून ती आणखी चांगली व्हावी आणि …
Read More »८ कँबिनेट मंत्र्यांसह ५ राज्यमंत्र्यांनी घेतली पदाची शपथ बडोले,सवरा, महेता यांच्यासह तीन राज्यमंत्र्यांना नारळ
मुंबईः प्रतिनिधी गेली अनेक महिने होणार होणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चेला आज रविवारी पूर्ण विराम मिळाला. विखे-पाटील, क्षिरसागर, कुटे, खाडे यांच्यासह ८ कँबिनेट मंत्र्यांनी तर सागर, महातेकर, सावे यांच्यासह ५ राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.विद्यासागर यांनी राजभवनात छोटेखानी झालेल्या समारंभात …
Read More »मंत्रिमंडळ विस्तारात शेलार, विखे, कुटे, सावे, क्षिरसागर, बोंद्रेचा समावेश ? रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात होणार शपथविधी
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे आणि डॉ. अनिल बोंद्रे यांचा समावेश होणार आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षिरसागर यांचा समावेश होणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. खासदार सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील …
Read More »
Marathi e-Batmya