राजकारण

याद राखा…अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समाजमाध्यमकर्त्यांना इशारा

मुंबई: प्रतिनिधी काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला असून अशा व्यक्तींवर …

Read More »

घरगुती वीज ग्राहकांसाठी खुषखबर: ऑनलाईन किंवा मे महिन्यात भरा बीले दंड न आकारण्याचा ऊर्जा विभागाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे घरगुती वीज ग्राहकांना आपले वीज बील भरण्यासाठी ऑनलाईन वीज भरा किंवा थेट मे महिन्यात थकीत बीले भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच स्वत:चा मीटर रिडींग घेवून पाठविले असेल तर वीजग्राहकांना जेवढा वीजेचा वापर केलाय तेवढेच बील आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीने घेतला आहे. सद्यपरिस्थितीत …

Read More »

११, १० आणि ९ वीचे विद्यार्थी परिक्षा न देता पुढच्या वर्गात परिक्षा रद्द केल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेवून इयत्ता दहावीचा भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपरला स्थगिती दिली होती. मात्र विषाणूचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसल्याने अखेर हे दोन्ही पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दोन पेपरची परिक्षा न देता गुण देण्यात येणार आहेत. …

Read More »

केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर राज्य सरकारकडून गुन्हे अमेरिका, रशियासह १८ देशाच्या परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल: गृहमंत्री देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचे संकट देशावर घोंघावत असतानाही तब्लीगीसाठी परदेशी नागरिकांना खास हजेरी लावता यावी यासाठी केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर अखेर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे या सर्व परदेशी नागरिकांवर व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून यात अमेरिका, रशिया, इराण यासह १८ देशातील नागरिकांचा …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली ५३ हजार किट्सची मदत संघटनांच्या प्रतिनिधींकडे केली मदतसामुग्रीचे वितरण

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट बसेसचे चालक आणि वाहक तसेच सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी मदत सामुग्री- किट्स विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या-त्या क्षेत्रातील संघटनांकडे सुपूर्द करण्यात आले. मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक आणि फेरीवाले, विक्रेते यांच्यासाठी अन्नधान्याच्या ३० हजार किट्स कामगार नेते शशांक राव यांच्याकडे सुपुर्द केल्या. एका परिवाराला लागणारा तांदूळ, गहू पीठ, डाळ, खाद्यतेल, साखर, चहा पावडर आणि …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, स्वरूप कसे असेल माहित नाही मात्र तयारीत रहा डॉक्टर, नर्सेस, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करा मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट पुढील काळात कसे स्वरूप धारण करेल ते सांगता येणार नाही. त्यामुळे पॅरा मेडिकल कर्मचारी तयार ठेवा, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय आरोग्य मंत्रालयाने केली आहे, निवृत्त सैनिकांना देखील सहभागी करून घ्या. कोरोनावर उपचारासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी  करताहेत. त्यांच्यावर हल्ले केल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही. …

Read More »

अधिकारी अमिताभ गुप्तांच्या निलंबनाचे अधिकार राज्य सरकारलाही ? अनिल गलगली यांनी सरकारला पाठविली नियमावली

मुंबई: प्रतिनिधी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या वाधवान बिल्डरवर मेहेरनजर दाखवित पत्र देणारे राज्याच्या गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांस निलंबित करण्याचा अधिकार केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारलाही असल्याची माहिती पुढे असून यासंदर्भातील नियमावलींची पुस्तिका-माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविण्यात आल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्त्ये अनिल गलगली यांनी …

Read More »

वाधवानला पत्र देण्यामागे भाजपातील बडा नेता? अमिताभ गुप्ता पत्रामागेही मास्टरमाईंड असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी शहरातील गोरेगावातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पातील वाधवान बिल्डरला वाचविण्यासाठी भाजपातील एका बड्या नेत्याने चार वर्षे सातत्याने पाठीशी घालत त्याला क्लीनचीट दिली. विशेष म्हणजे या वाधवानला वाचविण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यावर कारण नसताना निलंबित करण्याचा प्रकार या नेत्याने केला. त्याच नेत्याने आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्याकडून  वाधवान यांना पत्र उपलब्ध करून …

Read More »

सोमय्या ना, त्यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यासाठी प्रसिध्द असल्यानेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाने त्यांचे तिकीट कापले, त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत वाधवान प्रकरणी योग्य ती चौकशी होणार …

Read More »

महामहिम राज्यपालजी आता तुम्हीच मुख्यमंत्री ठाकरेंना विचारा आव्हाडप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्राद्वारे विनंती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात फक्त कोरोना आजारामुळे होत असलेल्या जीवीतहानी आणि वित्तहानीवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रयत्न करत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मारहाणप्रकरणी सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. मात्र आता आव्हाड यांना मुख्यमंत्री उध्दव …

Read More »