राजकारण

सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा तीन दिवस काम बंद आंदोलन वैद्यकीय सेवांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रूग्णालयातील चतुर्थश्रेणी सेवांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात या वर्गातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारी चतुर्त श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारला नुकताच दिला. यासंदर्भात संघटनेने जाहीर प्रसिध्दीपत्रकही काढले आहे. ११ ते १३ जून या कालावधीत तीन दिवस काम …

Read More »

पालघर आणि भिवंडीमध्ये होणार निकालाच्या सर्वाधिक ३५ फेऱ्या लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकांचे २३ मे रोजी निकाल येणार आहेत. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ३५ निवडणूक मतमोजणी निकाल फेऱ्या होतील. पालघर आणि भिवंडी – गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण ३३ निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण ३२ निवडणूक निकाल फेऱ्या …

Read More »

एक्झीट पोलमधील भाजपोत्सवाने नेत्यांमधला उत्साह वाढीला पण २३ मे च्या शिक्कामोर्तबाची वाट

मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झीट आणि ओपिनियन पोलमध्ये भाजप पुरस्कृत रालोआला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भाजपच्या राज्य आणि केंद्रामधील भाजप नेत्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असले तरी २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाच्या दिवसापर्यत पक्षाच्या संकल्प विजयावर शिक्कामोर्तब होण्याची वाट पहावी अशी …

Read More »

वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणासाठी सरकारचा अध्यादेश राज्य सरकारचा निर्णय महसूल मंत्री पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अद्यादेशामुळे रद्द झालेले विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य …

Read More »

पवार लागले कामाला २१ मे ला भाजप आघाडीतेर पक्षांची दिल्लीत बैठक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी २१ मे रोजी देशातील रालोआचे घटक पक्ष नसलेल्या आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांची दिल्लीत बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …

Read More »

मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता शिथिल करा निवडणूक आयोगाला पत्रः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पदवुत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा आऱक्षण होण्याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालने दिलेल्या निकालावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आचारसंहितेमुळे याप्रश्नी तातडीने तोडगा काढण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आचारसंहितेत सूट मिळावी अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री …

Read More »

राज्यातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करायचीय, मुख्यमंत्री महोदय वेळ द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे असे सांगत दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका …

Read More »

राफेलमधील चाेरीच्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयाकडून चौकशी माहिती अधिकारात मंत्रालयाची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राफेल खरेदी कराराच्या कागदपत्रांवरून मोदी सरकारकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. तसेच याप्रकरणातील कागदपत्रे चोरीस गेल्याचा दावा केला करण्यात आला होता. या चोरीस गेलेल्या कागदपत्र प्रकरणाची संरक्षण मंत्रालयाकडून अंतर्गत चौकशी सुरु असल्याची माहिती अधिकार कायद्यांतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली. माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर …

Read More »

टँकर देण्यासाठी २०१८ च्या लोकसंख्येचा आधार घ्या मराठवाड्यातील ३ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ची लोकसंख्या लक्षात न घेता 2018 ची लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून परभणी, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

दुर्बल व वंचित घटकांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करा! काँग्रेसची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी शालेय प्रवेशात राखीव असणाऱ्या २५  % जागांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या बंद आहे, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करून त्याची मुदत शाळा सुरू झाल्यानंतर ३ महिने सुरू ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे …

Read More »