राजकारण

पुण्यात अजित पवार यांची ताकद मोठी की शरद पवार यांची शक्ती प्रदर्शनात दिसणार वर्धापन दिन मेळाव्यांतून दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाची दोन्ही राष्ट्रवादींकडून स्वतंत्रपणे तयारी करण्यात आली आहे. आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होत असलेल्या या वर्धापन दिनास विशेष महत्व आले आहे. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास

भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व आचार आदर्श मानून राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे. पाचाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी  भव्य दिव्य शिवसृष्टी उभारली जाणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार  ३५२ वा …

Read More »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मागणी, दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा पाचवी आणि सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’पर्यंत लवकर कार्यान्वित करा

लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस …

Read More »

राज ठाकरे यांची मागणी, मुंबई रेल्वेसाठी वेगळं महामंडळ हवं, सरकार लक्षच देत नाही मुंबईत येणारे लोंढे मोठे, रस्ते, पूल, त्यांच्यासाठीच शहराचं नियोजन विस्कटलं

मुंब्रा स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून ७ ते ८ प्रवाशी पडल्याची दुर्देवी घटना घडली. तसेच या घटनेत ५ प्रवाशांच्या मृत्यू झाला. या घटनेवरून मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत राज्यातील भाजपा सरकार आणि मध्य रेल्वेवर आरोप आणि टीकेला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारचे बळी निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा

ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये ‘बटेंगे तो कटेंगे’वाल्या देवेंद्र फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये, भाजपाची विचारसरणीच विभाजनवादी

भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या बनवूण, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी केली आहे पण निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका, राहुल गांधी… फडणवीस यांचा लेख हास्यास्पद राहुल गांधी यांच्या प्रश्नांना भाजपा का उत्तर देतेय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा टोला, पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार ! अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो …

Read More »