केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काही चिंता नाही, पण जम्मू कश्मीर मधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर केली. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारला सहकार्य …
Read More »महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुमारंभ नद्यांचे पाणी आणि महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली माती मंगलकलशातून मुंबईत आणणार...
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रे चा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठया उत्साहात आज पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम …
Read More »बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून या बाबतच्या मान्यतेचे पत्र आज आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून …
Read More »पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून मदत पाच लाख रुपयांची मदत कुटुंबियांकडे सुपूर्द
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा अन्यथा कारवाई पोलिसांकडून देखरेख, थांबल्यास कारवाई केली जाईल
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे यास प्रत्युत्तरादाखल भारत सरकारने केलेल्या कारवाई करत भारतातील विविध भागात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत ४८ तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देत तरीही मुंबई महाराष्ट्रात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आश्वासन, काँग्रेस पक्ष मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार
महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने या समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध असून …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, देशात दुखवटा… भाजपा नेत्यांना लाज कशी वाटत नाही? अमरावतीत भाजपा नेते आणि मंत्र्यांचे सत्कार सोहळे
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना …
Read More »सागरी किनारपट्टीच्या समस्या आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय बैठक केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांसह सागरी किनारपट्टीच्या सर्व राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची उपस्थिती
किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. किनारपट्टीवरील मच्छिमारांचे हित जपणे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी किनारी समस्या सोडवणे, त्यांच्या विकास योजना यावर व्यापक चर्चा होण्याच्या दृष्टीने केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या अध्यक्षतेखाली २८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथे देशातील सर्व किनारपट्टीच्या राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्यासह बैठकीचे आयोजन करण्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर आरोग्यविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे द्यावा
राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, पहलगाम प्रकरणी सर्वपक्षियांना बोलावून माहिती द्या कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी याचा करावा तेवढा निषेध कमीच
जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …
Read More »
Marathi e-Batmya