राजकारण

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वाल्मिकी कराड आणि संशयित आरोपींची खाती गोठवली कराडच्या पत्नीसह अनेकांची सीआयडीकडून चौकशी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी यामागणीसाठी नुकताच सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातत्याने आंदोलन सुरु करण्यात येत आहे. तसेच अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या संभावित मारेकऱ्यांची …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?… धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट

देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे. माजी मंत्री छगन …

Read More »

प्रियांका गांधी वड्रा यांचा आरोप, सरकारने डॉ मनमोहन सिंह यांचा अपमान केला स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, राजधानीतील त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून शनिवारी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाल्या की, सरकारने निगमबोध घाट स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, भाषण संपताच तो व्हॉट्स चॅट बाहेर आलाच कसा आव्हाडांची पोलिसात तक्रार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास २० दिवस झाले. तरीही पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झाली नाही. मात्र या निर्घुण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यातच या प्रणातील संशयित आरोपी म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याचे नाव पुढे येत असून वाल्मिकी कराडला धनंजय मुंडे यांचे …

Read More »

उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा, १५० मतदारसंघात ईव्हीएम गडबड, युगेंद्र पवारच विजयी महायुतीला फक्त १०७ जागेवरच विजय

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात त्यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला मतदान जास्त झाल्याच्या मुद्यावरून गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र त्यास निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यामुळे पुढील होणारा संभावित संघर्ष टळला. त्याचबरोबर निवडणूक आयोग जर मतपत्रिकेवर मतदान घेणार असेल तर आपण आमदारकी …

Read More »

राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

शंभूराज देसाई यांची घोषणा, खाणपट्टा व्यवस्थापन प्रणाली, गड-किल्ल्यांचा विकास… माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणार

महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून आपल्या गड-किल्ल्यांनी ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा जपला आहे. महाराष्ट्राचा हा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्यासाठी गतीने प्रयत्न करावेत. त्यातून स्थानिक विकासालाही चालना देण्यात यावी, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात पर्यटन, …

Read More »

डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले

“पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. आज डॉ मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना त्याची प्रचिती येत आहे. गरिबीतून सुरुवात करुन बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा व आर्थिक शिस्त लावण्याचे काम डॉ मनमोहन सिंग यांनी केले …

Read More »

बीडमध्ये सर्वपक्षियांचा मोर्चा, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील, माजी खासदार संभाजीराजे, सुरेश धस आदी जण मोर्चात सहभागी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना अटक करा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या या प्रमुख मागणीसाठी आज मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांना अटक करा या मागणीसाठी आज सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्थानिक खासदार बजरंग सोनावणे, भाजपा आमदार सुरेश धस, …

Read More »