राजकारण

आचारसंहितेच्या भितीने राज्यपाल नियुक्त महायुतीच्या सात आमदारांचा उरकला शपथविधी १२ पैकी सात आमदारांचा उरकला शपथविधी

अपेक्षप्रमाणे दसरा सणानंतर विधानसभा निवडणूकीची आचार संहिता कधीही लागू होऊ शकते याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्याने आज सकाळी घाईघाईत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी ७ आमदारांची निवड करण्यात आली. तसेच या ७ आमदारांना विधानसभेत घाईघाईत शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल …

Read More »

शरद पवार यांचा टोला, ४८ पैकी ३१ जिंकल्यावर यांना लाडकी बहिण आठवली संजीवराजे निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यापासून अजित पवार हे सातत्याने प्रत्येक जाहिरसभेत बोलताना माणसानं आता कुठेतरी थांबायला हवं, वय झालं पुढीच्या पिढीच्या हातात सगळं सोपवायला पाहिजे असे सांगत अप्रत्यक्ष शरद पवार यांना निवृत्तीचे वय झाल्याची आठवण करून देत असतात. आज साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव संजीवराजे निंबाळकर आणि …

Read More »

बाबा सिद्धीकींवर हल्ला करणाऱ्या आणखी एकास अटक, दोघांना कोठडी अमरावतीच्या लोणकर आणि अल्पवयीन असल्याचे सांगणारा वयात आलेला

वांद्रेतील महाराष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करून ठार मारणाऱ्या आरोपीला आज पोलिसांनी अमरावतीतून अटक केली असून अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोणकर असल्याचे समजते. तर यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या गुरनैल सिंग आणि धर्मराज कश्यप यांच्यापैकी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने धर्मराजचे वय तपासण्याचे …

Read More »

अतुल सावे यांची घोषणा, येत्या काळात प्रत्येक गिरणी कामगारांना घरे मिळतील १ लाख ८ हजार जणांना घरांचे वाटप करणार

अनेक दिवसांपासून गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात येत आहे. आजमितीस गिरणी कामगारांचे १ लाख ७४ हजार अर्ज अर्ज प्राप्त झाले. त्यात कामगार विभागाने …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ योजना ‘फेक इन इंडिया’ भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकीला खीळ

नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. गेल्या दशकात आर्थिक धोरणनिर्मिती स्थिर, अंदाजे आणि समजूतदार ठरली नाही. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली आहे. नरेंद्र …

Read More »

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय आगरी समाजासाठी महानंडळ, नदी जोड प्रकल्प, शेती महामंडळाची जमिन एमआयडीसीला यासह अनेक निर्णय

राज्यात दसरा सण झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असे सांगत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक समाजांना आकर्षित करण्यासाठी नवी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका,… पराभवाच्या भितीमुळेच मुंबईतील टोल माफी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील (MTHL) कार आणि लाईट मोटार वाहनांच्या टोल माफीचे काय?

मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्यानेच हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर टोल माफी जाहीर केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती करण्याचे काम १२८ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन

बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत, या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे काम शासन करणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कांजूरमार्ग येथे १२८ कोटी रुपये खर्चातून मुंबई …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत महाराष्ट्र क्रमांक एकवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमीपूजन संपन्न

राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. …

Read More »

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे ते चांगले… त्यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आणि वेदनादायक

वांद्रे पूर्वचे आमदार आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी हे त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून पडल्यानंतर त्यांच्यावर तीन-ते चार आरोपींनी दुचाकीवर येत गोळीबार केला. या गोळीबारातच बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्धीकी यांना लीलावती रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेवरून महाविकास आघाडीतील विरोधकांनी महायुती सरकार आणि …

Read More »