राजकारण

धार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवा अल्पसंख्याक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयांचे आवाहन

मुंबई उपनगरातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते सन २०२४-२५ या वर्षासाठी अल्पसंख्याक बहुल शाळांनी १५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम पर्याय सुचवा पुढील ५० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवा

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट द्यावी. भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम व्यवहार्य …

Read More »

राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून भाजपाचा गोंधळ, काँग्रेसचा पलटवार भारत विरोधी मते बाळगणाऱ्या महिला सिनेट मेंमर इल्हान ओमर हीची घेतली भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून राहुल गांधी यांनी वादग्रस्त अमेरिकन महिला सिनेट मेंबर्स असलेल्या इल्हान उमर यांना भेटल्याबद्दल भाजपा नेत्यांकडून या भेटीवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा दौरा अमेरिकेचा असला तरी त्याचे पडसादर भारतात उमटत आहेत. सिनेट काँग्रेसच्या सदस्या इल्हान ओमर या भारत …

Read More »

अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे …

Read More »

मोहन भागवत यांचे वादग्रस्त विधान, शिवरायांची समाधी टिळकांनी शोधली वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता

मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर आणि स्थानिक भाजपा आमदार खासदारांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्या. या घटनेमुळे महायुती सरकार धास्तावले असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी शिवरायांच्या समाधीवरुन केलेल्या विधानामुळे आता पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची स्थिती …

Read More »

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता आणण्यासाठी उच्चधिकार समिती राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना दिली जाते शिष्यवृत्ती

विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक न्याय व …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारचा भूखंडावर ताव, लाडक्या मंत्र्यांसाठी योजना बिल्डरमंत्री संजय राठोड लाभार्थी

महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रिमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल …

Read More »

पवन खेरा यांचा सेबी प्रमुखावर आरोप आणि महिंद्राची स्पष्टोक्ती माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीतून उत्पन्न मिळविल्याचा आरोप

काँग्रेसने मंगळवारी सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर हितसंबंधांचे नवीन आरोप केले आणि दावा केला की त्यांचे पती धवल बुच यांना २०१९-२०२१ दरम्यान महिंद्रा आणि महिंद्रा समूहाकडून “वैयक्तिक क्षमतेने उत्पन्न” म्हणून ४.७८ कोटी रुपये मिळाले. महिंद्रा समूहाने हा आरोप खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना …

Read More »

कॉम्रेड सीताराम येचुरी रूग्णालयात, प्रकृती चिंताजनक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

देशातील काँग्रेसच्या नेकृत्वाखालील युपीए १ आणि २ च्या काळात कॉम्रेड सीताराम येचुरी यांची भूमिका प्रामुख्याने महत्वाची ठरली होती. मात्र कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाच्या आजारामुळे दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येचुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाच्यावतीने देण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये सांगण्यात …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये तीन …

Read More »