राजकारण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मंत्रिमंडळाची बैठक संपन्न

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत मस्त्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणे, अटी व शर्ती देऊन शेवगांव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष, अंगणवाडीस सोलर सिस्टीम देणे, न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारीत भत्ते, कुक्कुटपालन संस्थाना व्याजदंड माफी यासह महत्वाच्या १० विषयांवर निर्णय घेतला. राज्य …

Read More »

लाडकी बहिण योजना आणि शेतकऱी कुटुंबासाठी राखीव निधीबाबत सरकारचा खुलासा लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला वर्गाची मता नजरेसमोर ठेवत आणि त्यांना खुष करण्यासाठी मुख्यंमत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने जाहिर केली. मात्र या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी लाभार्थ्यांना निधी वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच आदिवासी विभाग, समाज कल्याण विभागाचा निधी या योजनेसाठी वळविला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी राखीव असलेला निधीही या …

Read More »

पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ९ हजार कोटी रूपये खर्चून सुधारणा करणार ६ पदरी उन्नत आणि बाह्यवळण रस्ता मार्ग सुधारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते शिरुर हा ५३ कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, पालकमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली जिल्ह्यात…. लोकांच्या जिवंतपणीच्या मरण यातना प्रत्यक्ष जाऊन बघाव्यात

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. या जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दाम्पत्य दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट काढत जात असल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करीत शासनाच्या आरोग्य व्यवस्थेती चिरफाड करीत या घटनेमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. विजय वडेट्टीवार व्हिडीओ शेअर करत म्हटले की, आजोळी …

Read More »

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर …

Read More »

शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे १५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे १० सप्टेंबर रोजी येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. तसेच १० सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न,नागरी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जागवाटपाची चर्चा अद्याप नाही, पण मुख्यमंत्री पदाचा… काहीही झालं तरी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढविण्यावरून रस्सीखेच सुरु असतानाच मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यावरून शिवसेना उबाठा गटाकडून आग्रह असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सावध भूमिका मांडली …

Read More »

राहुल गांधी यांचा विश्वास, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देणार जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना दिला विश्वास

स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याचा असलेला राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रीय प्रदेश बनविण्याचा प्रयत्न सुरु असून हा प्रयत्न हाणून पाडू आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ असा विश्वास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी

मागील दोन दिवस विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत… मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का ?: विजय वडेट्टीवार

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल …

Read More »