राजकारण

भाजपासाठी सुनिल तटकरे धावले, मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देतो… माझी केंद्रीय समिती अध्यक्षपदी झालेली निवड

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्व कमी झाल्याच्या कपोलकल्पित बातम्या गेले काही दिवस आमच्या हितचिंतकांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा आपल्या मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वागणूक देतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली हे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांच्या टिकेतील हवा काढून …

Read More »

हरियाणा निवडणूकीत राहुल गांधी यांच्या डंकीच्या प्रकरणावरून वादळ पंतप्रधान मोदी मात्र न्युयार्कमधील हरियाणाच्या महिलांच्या नृत्याचे कौतुक

हरियाणातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शाहरूख खान यांनी केलेल्या डंकी चित्रपटातील घटनेप्रमाणे काही घटना हरियाणात घडत आहेत. डंकी चित्रपटातील कलाकारांप्रमाणे बेकायदेशीररित्या युरोप आणि अमेरिकेत पैसे कमाविण्यासाठी गेलेल्या हरियाणाच्या नागरिकांना काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्या तरूणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटले. तसेच या दोघांमध्ये थेट संवादही घडवून …

Read More »

बिच्चारे अजित पवार, “इकडून धक्का, तिकडून धक्का देतोस का रे” म्हणण्याची पाळी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने अजित पवार यांना बाहेर पडण्यासाठी आणखी एक निमित्त

लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मध्य प्रदेशातील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांना मत देणे म्हणजे शरद पवार यांच्या घराणेशाहीला मत अशी टीका केली. त्यानंतर पुढील काही दिवसातच राष्ट्रवादीत नाराजी नामा घडत अजित पवार …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य सचिव यांच्याकडे व्यक्त केली नाराजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. यावेळी केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री-महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? रश्मी शुल्कांसारखे वादग्रस्त अधिकारी हटवा-काँग्रेसची मागणी

विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार …

Read More »

केशव उपाध्ये यांची टीका, मविआच्या ‘खोटा फॅक्टरी’ला न्यायालयाची सणसणीत चपराक संजय राऊत यांच्या शिक्षेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया

उबाठा सेनेचा भोंगा आणि मविआचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने, त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकविण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना …

Read More »

माजी मंत्री रोहिदास पाटील उर्फ दाजी यांच्या निधनाने अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व हरपले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शोकसंदेश

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना त्यांच्या मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात दाजी या टोपणनावाने परिचित होते. रोहिदास पाटील यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. रोहिदास पाटील हे काँग्रेस विचाराचे सच्चे पाईक होते. काँग्रेसचा विचार त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही. रोहिदास पाटील यांच्या निधनाने सुसंस्कृत, संयमी, विनम्र …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांचा दौरा रद्द, पण सामान्यांना झालेल्या त्रासाचं काय ? स्टॅच्यु ऑफ युनिटी पक्की बांधली, मग महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला ?

मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस होऊन त्यात सर्वसामान्यांचे हाल झाले. यावरून सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरत ‘काल काही मिनिटांच्या पावसात मुंबई पुणे ठाणे परिसरातील लोकांचे हाल झाले. अर्ध्या एक तासाच्या पावसात मुंबई ठप्प झाली. काल पश्चिम वेस्टर्न एक्सप्रेस हायवे देखील ठप्प झाला, रेल्वे ठप्प झाल्या असे सांगत कुठे होते मुख्यमंत्री …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत… 'शाहना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'

शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप जंयत पाटील यांनी सरकारवर केला. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील …

Read More »