राजकारण

शरद पवार यांची टीका, केंद्र सरकारने विरोधी पक्षनेते पदाचा आदर… राहुल गांधींना बसविले मागच्या रांगेत

काल स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बसण्यासाठी मागच्या रांगेतील जागा दिल्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाज माध्यमावरून एनडीए सरकारवर टिकेची झोड उठली असून काँग्रेसने सरकारची मानसिकता काय आहे याचा हा पुरावा असल्याचे म्हटले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, सेक्युलर सिव्हील कोड, मोदींनी हिंदूत्व सोडलं का? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करा माझा पाठिंबा

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव जाहिर करा. त्यासाठी माझा पाठिंबा असेल अशी घोषणा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना करत यावेळी पक्षाचे नेते आहेत त्यामुळेच तर जागा निवडून येतात. त्याकरीता महाविकास आघाडीने चेहरा जाहिर करावा. मी पाठिंबा देतो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यांनी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहसाठी महाराष्ट्र म्हणजे एटीएम महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न

भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करून मोदी-शाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरयाणा व जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झारखंड आणि महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम एकत्रित जाहिर करण्याची शक्यता

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर चार राज्यातील विधानसभा निवडणूका एकदमच होतील अशी अटकळ बांधली जात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी हरयाणा व जम्मू काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला. मागील काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली …

Read More »

चित्रा वाघ यांची माहिती, देवेंद्र फडणवीस १८ ऑगस्टला साधणार लाडक्या बहिणींशी संवाद १० हजार महिला उपस्थित राहणार

महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता लाडक्य़ा बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेबद्दल माता-भगीनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी १८ ऑगस्ट रोजी राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक स्वरूप …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, माहेरचा आहेर दिला; तर लाभार्थी महिलांची स्पष्टोक्ती, सख्खा भाऊ विचारत… बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी जमा झाल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान

मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन…घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज पैसे मागणार नाही..सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले…मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले..रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली..राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, गणेशोत्सव स्पर्धेतील विजयी मंडळास लाखांचे बक्षिस उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविणार

राज्यात गणेश उत्सवास ७ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन २०२४ च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, राज्यातील …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून ७-८ वेळा निवडणूक लढवलीय आता… सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत जनताच निर्णय घेईल

मागील काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यातच अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. या निमित्ताने महिला वर्गाला आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा टोला, … हे मी नाही सांगत तर केंद्राचा डेटाच सांगतोय जो न्याय दुसऱ्या राज्यांना तोच महाराष्ट्राला मिळाला पाहिजे

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी भवन प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करुन राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा …

Read More »

नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा… लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा शेतकरी, जवानांबद्दल एक शब्दही नाही केवळ राजकीय भाषण

हजारो शूरविरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला …

Read More »