राजकारण

अतुल लोंढे यांचा सवाल,… निधी देण्यासाठी पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षण अधिसूचना

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे …

Read More »

संजय राऊत यांची घोषणा, अखेर आज महाविकास आघाडीचा विस्तार, हे पक्ष झाले सहभागी

महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी झालेली नसून राज्यातील आघाडी आता मजबूत झाली आहे. तसेच या आघाडीचा विस्तार झाला आज झालेला असल्याची घोषणा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जसे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी केल्याचे पत्र हवे तसे पत्र आंबेडकर यांना …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी मोहीम राबवा

आदिवासींकडे मूलभूत कागदपत्रे असलीच पाहिजेत तसेच त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवुन या कामाला प्राधान्य द्यावे. आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी यंत्रणा तयार करुन ही मोहीम मे महिन्यापासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री जन मन योजनेच्या आढावा बैठकीत …

Read More »

सुभेदार (नि) टी. एम. सुर्यवंशी यांची मागणी, अपमान करणारी ‘अग्निवीर’ योजना रद्द करा

केंद्र सरकारने लष्करासाठी लागू केलेली ‘अग्निवीर’ योजना फसवी असून सैनिकांचा अपमान करणारी आहे. या योजनेत केवळ ४ वर्षांची सेवा करण्याची संधी दिली जाते, वेतन केवळ २१ हजार आणि निवृत्तीनंतर कोणतेही लाभ दिले जात नाहीत. ‘अग्निवीर’ योजनेतून लष्करात चार वर्ष सेवा केल्यानंतर या सैनिकांना ऐन उमेदीच्या वयातच वाऱ्यावर सोडले जाते. अग्निवीर …

Read More »

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली बिहारमध्ये, भाजपावर टीकास्त्र

नुकतेच बिहारमधील इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमध्ये प्रवेशली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर टीकास्त्र सोडताना मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यु टर्नच्या भूमिकेवर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. राहुल …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला,… अभ्यासाचा नियमित सराव करा

कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘परीक्षा पे चर्चा’ या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद …

Read More »

अजित पवार यांची ग्वाही, दसरा महोत्सव १० दिवस साजरा होण्यासाठी निधी देणार

कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज इमारत, विभागीय क्रीडा संकुल, शेंडा पार्क येथील प्रशासकीय इमारत, रंकाळा सुशोभीकरण यासह जिल्ह्यातील विविध विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देवू, अशी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशासाठी ?

राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देत असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार फक्त गायीच्या दुधासाठी महिनाभरासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बारा नियमांची लांबलचक यादी देण्यात आली आहे यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

शिवसेना उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची राज्यसभेतील जागा कमी होणार

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना …

Read More »