राजकारण

विजय वडेट्टीवार यांची मागणी, राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर श्वेत पत्रिका काढा

पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. यापुढील सर्वच …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, विधानसभा अध्यक्षांचा निवाडा न्यायालयीन नव्हे तर….

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आलेल्या निकालानंतर पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दोन-तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि …

Read More »

नाना पटोले यांची टीका, नार्वेकरांचा निकाल दिल्लीतील गुजरात लॉबीने दिलेला ड्राफ्ट

शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते, पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावलल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही यावेळी डावलल्याचे स्पष्ट …

Read More »

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा, कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबत नाशिक जिल्ह्यातील विधान परिषदेचे माजी सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषी मंत्री मुंडे यांच्याकडे बैठकीचे मागणी केली होती. त्या …

Read More »

घरकुल अनुदानाची रक्कम वाढवित राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीसाठी ५० हजार रूपयांचे अनुदान मिळत होते. मात्र केंद्रीय नगरविकास विभागाने अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार आता भूमीहिनांना घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या जमीन खरेदीसाठी १ लाख रूपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता …

Read More »

पर्वतापूर आणि कोथेरी प्रकल्प बाधितांना असे मिळणार आर्थिक पॅकेज

राज्यातील पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पातंर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहणखेड व मौजे पर्वतापूर, जि. अमरावती आणि कोथेरी लघुपाटबंधारे ता. महाड, जि.रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र

कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात ग्रामीण भागामधील अतितीव्र कुपोषित (SAM)बालकांच्या कुपोषणावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अंगणवाडीस्तरावर ग्राम …

Read More »

विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णयः शिवसेना सगळी शिंदे गटाचीच

मागील दोन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या शिवसेना अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवूनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर दिड वर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांचे सदस्यांची सुनावणी घेत आज अंतिम निकाल दिला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल जाहिर करताना म्हणाले, शिवसेना राजकिय पक्षाची घटना दोन्ही गटाकडून …

Read More »

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारली

देशातील हिंदूत्ववादी राजकारणामुळे धार्मिक राजकारणाला मोठे बळ मिळत देश दोन धर्माच्या विचारधारेत विभागत असल्याच्या काही घटना घडल्या. त्यानंतर राजकिय विचारधारेबरोबरच सामाजिक दुभंगलेपण देशात निर्माण होत असल्याची चर्चा सातत्याने विविधस्तरावर सुरु झाली. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकिय हेतूशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही सामाजिक संघटनांनी देशात निर्माण झालेले दुभंगलेपण कमी करण्याच्या …

Read More »

गडचिरोलीतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे. महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढील काळात …

Read More »