राज्यातील गंभीर प्रश्नांवर आरक्षणावर फक्त “तारीख पे तारीख” मिळत असल्याची उपरोधिक फिल्मी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेप्रकरणी सातत्याने तारीख पे ताऱीख दिली जात आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकिय आरक्षण, धनगर आरक्षण प्रश्नी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, शासन जनतेच्या दारी तर मग जनता शासनाच्या दारी का ? मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही
राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे …
Read More »रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा रसिकांसाठी माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल सोयीचे ठरणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,… पंतप्रधान मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का? मोदी सरकारची धोरणे, योजना ह्या मित्रों व अदानीच ठरवतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी याआधी दलितांना नक्षलवादी म्हटले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनाही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी म्हणून अपमानित केले होते. ८० कोटी अन्नदात्यांनी …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, पंतप्रधान मोदींची टीका चुकीची पंतप्रधान मोदींचं वक्तव्य क्लेशदायक
२१ सप्टेंबरला महिला आरक्षणाच्या विधेयकाला दोन सदस्य सोडले तर कोणीही विरोध केला नाही. एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका चुकीची आहे. महिला आरक्षणावर आधी देखील विचार झालेला आहे. पंतप्रधानांनाचे ते वक्तव्य क्लेषदायक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबविण्यात येणार असून लोकसहभागातून …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचं सोंग राजकिय नेतृत्वामुळे नागपूरकरांना पूरपरिस्थितीला सामोरे जावं लागलं
आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचा सोंग घेऊन नागपूरच सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूर परिस्थितीत ढकलून देण्याच पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केलं, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अंबादास दानवे यांनी आज नागपूर येथे आलेल्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले ? पदभरतीतील घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा
तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून पेपर फुटले आहेत तरीही सरकार ही नोकर भरती रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मुंबई पोलीस भरती आणि वन विभाग भरतीचा सुध्दा पेपर फुटला आहे.सत्ताप्राप्तीसाठी खाली केलेले खोके भरण्यासाठी पेपर फुटले का असा खोचक सवाल करत या सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करून घोटाळा …
Read More »भारतावरील आरोपानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला नाझी समर्थकाचा सन्मान कॅनडात विरोधकांकडून टीकेचा भडिमार
खलिस्थानी समर्थक हरदीपसिंग गुज्जर यांच्या हत्याप्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना हिटलरच्या एसएस संघटनेत असलेल्या आणि ज्यु नागरिकांच्या विरोधात उभारण्यात आलेल्या छळ छावणीचा भाग राहिलेल्या यारोस्लॅव हुनका यांचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलावून सत्कार केल्याप्रकरणी कॅनडाचे …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम…अन्यथा ४८ जागा लढविणार इंडिया आघाडीने सात दिवसात निर्णय घ्यावा
सन २०१९ च्या लोकसभा ६.९८ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही, आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यासंबधी काँग्रेसला रस आहे का, या संबधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या पत्राच्या उत्तराची अपेक्षा आहे असे सांगत जर सात दिवसात …
Read More »
Marathi e-Batmya