राजकारण

मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाऊले टाकणे सुरु

मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदेतज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिला …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, आरक्षण मिळेपर्यंत माझा उंबरा शिवणार नाही… दुसऱ्यांदा सुरु केलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मागे

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरु केलेले आमरण उपोषणाचे आंदोलन आज मागे केले. विशेष म्हणजे राज्य सरकारच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने दोन शिष्टमंडळे पाठविली होती. त्यातील पहिल्या शिष्टमंडळामध्ये ज्या निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींच्या समितीतील तीन न्यायमुर्ती भोसले, शिंदे आणि अन्य एक न्यायाधीश व तसेच …

Read More »

प्रकाश सोळंके यांचा आरोपः बंगला, गाड्या जाळण्यामागे मराठा नव्हे तर राजकीय विरोधक अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेचा स्थानिक प्रतिस्पर्ध्यावर आरोप

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला आणि गाड्या जाळण्यामागे मराठा आंदोलक नसून यात राजकीय विरोधक तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांनी आज येथे केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची होती अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली . आमदार प्रकाश …

Read More »

अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला,… हे नितेश राणेंनी पंतप्रधानांना विचारावे मराठा आरक्षणावरील काँग्रेसच्या भुमिकेबद्दल नितेश राणेंनी आधी पिताश्रींना तरी विचारावे

आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे. पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे. देशभरातील विविध जातींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर, ‘जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे’, असा ठराव …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातही ६९ टक्के आरक्षण करा… मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आरपीआय शांततापूर्ण आंदोलन करणार

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे; त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढविले पाहिजे. तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, शासन आपल्या दारी कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच मंत्रालयाबाहेर… मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा

सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अपयशी ठरला आहे. त्यामुळेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना सल्ला, …भाजपापासून सांभाळून रहा मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्यावा

जालन्यात अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसंच, पुण्यात कोयता गँग सक्रीय आहे. ड्रग्ज माफियांचं साम्राज्य या राज्यात आहे. इतकचं काय तर राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत हे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांना आरक्षण दिलं जात नाही. महाराष्ट्र आज पेटला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, …

Read More »

सुनिल तटकरे यांचे आवाहन, … नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचेय वर्धा जिल्हयातील विविध पक्षातील पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश

अजितदादांच्या नेतृत्वाखाली नवा विचार घेऊन राष्ट्रीय पातळीवर खासदार प्रफुलभाई पटेल काम करत आहेत आणि आपण महाराष्ट्रात वेगळी दिशा घेऊन कार्यकर्त्यांच्या सोबतीने राज्यात नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज केले. आज वर्धा येथील विविध पक्षातील पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांचा …

Read More »

ठाकरे गटाची पत्राद्वारे थेट राष्ट्रपतींकडे मागणीः संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा पाच किंवा ६ तारखेची चर्चेसाठी वेळेची मागणी

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सर्वपक्षिय नेत्यांनी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रश्नी पुन्हा आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात सत्ता सहयोगी पक्षाच्या आमदारांच्या घरांच्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु …

Read More »

मराठा आरक्षण मिळूपर्यंत ‘या’ गावात दिवाळी साजरी न करण्याचा निर्धार मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर साजरी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय

राज्यात मराठा आरक्षण मुद्धा तापत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली आहे. अशातच राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. नाशकात देखील सकल मराठा समाज आक्रमक …

Read More »