शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नसून पवारांसारखे नेते राजकारण, समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. पवारांनी घेतलेला निर्णय ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत बाब …
Read More »अखेर नेते, कार्यकर्त्यांच्या अश्रुंसमोर शरद पवार यांचे मन द्रवलेः २-३ दिवसात निर्णयाचा फेरविचार अजित पवार यांच्या मार्फतच कळविला निर्णय
मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भावनिक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेते तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भावनिक होत आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आपला निर्णय बदलावा म्हणून शरद पवार यांना साद घातली. तसेच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी आपला निर्णय बदलल्याशिवाय आपण …
Read More »नाना पटोले यांची मागणी, सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा छत्तिसगडप्रमाणे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा : अशोक चव्हाण
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेला सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प …
Read More »काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही भाजपाशी आतून बोलणी सुरु, किती दिवस सोबत राहतील माहिती नाही
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीची भाजपासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहिती नाही. तसेच राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या अध्यक्षाला आपण साथ देऊ शरद पवारांच्या निर्णयाचे अजित पवारकडून समर्थन, जरा त्यांचाही विचार करा
राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांनी त्यांच्या एका निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच, इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलं. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी भाषणाच्या शेवटी शरद पवारांनी हा निर्णय …
Read More »शरद पवार यांच्या त्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन, नेत्यांना तर अश्रूच आवरेना पवार साहेब तुम्हीच आम्हाला पक्षाचे अध्यक्ष म्हणून हवे आहात म्हणून दिली भावनिक हाक
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं आज २ मे जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पुढील निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी समिती सूचवली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला. शरद पवार म्हणाले, …
Read More »शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचे का जाहिर केले? वाचा त्यांचे संपूर्ण भाषण, भाषणातच सांगितली कारणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा आज दुपारी केली. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या सुधारीत राजकिय आत्मचरित्राचा प्रकाशन प्रसंगीच “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठे तरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं …
Read More »उध्दव ठाकरे यांचा अमित शाहंना थेट इशारा, जमिन काय असते हे दाखविल्याशिवाय राहणार नाही… वज्रमुठ सेभेत शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवर साधला निशाणा
काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर आलेले असताना तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जमिन दाखविणार असल्याचा जाहिर इशारा दिला. त्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्याच वक्तव्याचा धागा पकडत आज महाविकास आघाडीचे मुंबईतील वज्रमुठ सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …
Read More »अजित पवार यांचा सरकारवर निशाणा, हे काम शिंदे-फडणवीसांचे नाही का? ते काय करतायत ? मागच्या वर्षीची बिलं द्यायला पैसे नाहीत...मदतीच्या घोषणा अनेक केल्या पण लोकांपर्यंत त्या पोहोचल्याच नाहीत
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांसह विकास कामांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला. पण आर्थिक अडचणीमुळे कधीही निधी अडविला गेला नाही. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्या आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या पण त्याचे पैसे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाहीत. त्याचबरोबर अर्थसंकल्प होऊन …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरपाईची रक्कम जमा करा अन्यथा… पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा करा
अदानीचा GST माफ होतो तर कृषी साहित्यावरील GST माफ का होत नाही ? अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके वाया गेली आहेत, पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे करण्यास वेळ नाही. सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ …
Read More »
Marathi e-Batmya