राजकारण

काँग्रेस नेते वेणुगोपाल ठाकरे यांना भेटल्यावर म्हणाले, आम्ही उध्दव ठाकरेंच्या सोबत…भेटीचे निमंत्रण संयुक्त पत्रकार परिषदेत दिली चर्चेची माहिती

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी माध्यमाशी बातचित केली. वेणुगोपाल म्हणाले की, उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हाच निरोप घेऊन मी …

Read More »

मलिक यांच्या त्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ते भाजपाच्या विचारांचे… पुलवामा प्रकरणावेळी ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, लाखो लोक रखरखत्या उन्हात अन् VIP लोक मात्र AC त, हा कुठला न्याय? शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन होते. या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका कार्यक्रमाला आलेल्या श्रीसदस्यांना बसला व उष्माघाताने १३ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला व ५०० च्या वर रुग्णालयात उपचार घेत आहेत, ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा …

Read More »

नाना पटोले यांचा नरेंद्र मोदींना इशारा, भूमिका स्पष्ट करा अन्यथा…. अदानीने जनतेच्या घामाचा पैसा लुटला त्याचा हिशेब मोदींना द्यावाच लागेल

जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नी देशाच्या पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही, म्हणूनच काँग्रेस पक्षाने ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला आहे. पुलवामा प्रकरणी …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा सवाल, संघाला असला कारभार चालतो का?… शेतकरी हवालदील अन हे रामभक्त म्हणून अयोध्येत

राज्यात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेलो म्हणून माझ्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. पण मी माझ्या वाड-वडिलांपासून सांगत आलोय की आमचं हिंदूत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदूत्व नाही. आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडलेले आहे. पण भाजपाने एकदा जाहिर करावं कि त्याचं हिंदूत्व हे नेमकं कशाचं हिंदूत्व आहे ते कदाचीत त्याचं हिंदूत्व हे गोमूत्रधारी …

Read More »

जयंत पाटील यांच्या “त्या” वक्तव्यावर भरसभेतच अजित पवार यांनी लावला कपाळाला हात भारत जर विश्वगुरू बनणार असेल तर त्यास आमचा पाठिंबा

मागील काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणीस सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत पुन्हा जाणार असल्याच्या चर्चाही जोरात सुरु आहेत. नेमके महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांची …

Read More »

खासदारकी रद्द होण्यास कारणीभूत ठरलेल्या कोलारमधूनच राहुल गांधी यांनी फुंकले प्रचाराचे बिगुल माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचा भाजपाला रामराम

कर्नाटक विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्यास येथील कोलारच्या प्रचार सभा कारणीभूत ठरली होती. त्याच कोलारमधून कर्नाटक निवडणूकीच्या प्रचाराला राहुल गांधी यांच्या सभेने आज सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या …

Read More »

अॅड आशिष शेलार यांचा खोचक सवाल , “हे” महाराष्ट्रात धारातीर्थी का पडत आहेत? अतिक बंधुच्या एनकाँऊटरवरून संजय राऊत, ठाकरेंवर साधला निशाणा

उत्तर प्रदेशमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या आणि तुम्ही धारातीर्थी मुंबईंत का पडताय? असा सवाल भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारला आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांशी ते बोलत होते. अतिकचा एनकांऊटर झाला तो गुंड होता त्याची बाजू का घेताय? उत्तर परदेशमध्ये जी काल घटना घडली …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा,… राज्यभर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपला उत्तर द्यावेच लागेल

पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, …

Read More »

जयंत पाटील यांची अखेर ग्वाही, त्या युवकांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी… रॅप सॉंग्सच्या माध्यमातून व्यवस्थेवर कडक शब्दात टिका करणार्‍या युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी

व्यवस्थेवर कडक शब्दात रॅप सॉंग्सच्या माध्यमातून टिका करणार्‍या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहिल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका …

Read More »