लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …
Read More »पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदार ठेवीबाबतचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आढावा पैसा परत मिळावा संबधीच्या प्रक्रियेचा घेतला आढावा
पॅनकार्ड क्लब लि. मध्ये गुंतवणूकदारांनी पैशांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा या संबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यापूर्वी ११ जून २०२५ रोजी आढावा घेतला होता. त्यानुषंगाने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज मंत्रालय येथे पुन्हा आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय …
Read More »मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन
कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. कौशल्य विकास मध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित …
Read More »भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा आरोप, महायुती सरकारने केला आश्वासनाचा भंग अल्पसंख्याक समाजाच्या संस्थाना सरकार सापत्न वागणूक देतेय
राज्य उर्दू साहित्य अकादमी यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात फक्त १ कोटी २० लाख इतक्या अत्यल्प निधीवर बोळवण करत महायुती सरकारने वचनभंग केला. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाच्या संस्थांना जाणिवपूर्वक भेदभावाची वागणूक देत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला. तसेच उर्दू …
Read More »लाडक्या बहिणीना आता ई-केवायसी बंधनकारक-२महिन्यात करणे आवश्यक केवायसी केली तरच महिन्याचा निधी मिळणार
राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर त्यांनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण केले नाही तर त्यांना लाभ मिळू शकणार नसल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गुरुवारी, महिला आणि बालविकास विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले. मंत्रिमंडळाच्या …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा मराठा समाजाला ज्या प्रमाणात निधी दिला जातोय त्याच प्रमाणात इतरानाही द्या
हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत.परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नवे असे आवाहन त्यांनी केले. हा काढलेला जीआर रद्द करा किवा आवश्यक त्या सुधारणा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘केंब्रिज’सोबत सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हरसिटी सोबत करार
महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट …
Read More »भरत गोगावले म्हणाले, बांबू लागवडीमुळे पर्यावरण विकासासह ग्रामीण व हरित महाराष्ट्राला चालना जागतिक बांबू दिनानिमित्त येथे परिषद
पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल, पृथ्वीचा ऱ्हास टाळायचा असेल तर वृक्ष लागवडीबरोबर बांबू लागवड हाच मुख्य पर्याय आहे. बांबू लागवड ही शाश्वत पर्यावरण विकासासह शेतकऱ्यांसाठी नफा देणारी आणि ग्रामीण भागासाठी रोजगार निर्मिती करणारी ठरणार आहे. राज्य शासन हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यास कटिबद्ध असल्याचे रोजगार हमी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा
भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …
Read More »
Marathi e-Batmya