राजकारण

संजय राऊत लव्ह जिहादवरून म्हणाले, हिंदू मुलांकडूनही खून झालेत…

देशात आधीच लव्ह जिहादवरून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात या अनुषंगाने स्वतंत्र कायदाही आणण्यात आला. त्या पाठोपाठ राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारच्या समर्थक विशेषत: भाजपाच्या आमदारांकडून महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा कांगावा करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. त्यातच पालघरच्या श्रध्दा वालकरची …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शांत का?

दिवसेंदिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत असून आधी सीमावर्ती भागातील गावांवर दावा सांगितला. त्यानंतर सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येवू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले. तर दुसऱ्याबाजूला सोलापूरात कर्नाटक भवनची आवश्यकता नसताना सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करत सीमाप्रश्नी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे. …

Read More »

उदयनराजे यांच्या त्या वक्तव्यावर उध्दव ठाकरे म्हणाले, उदयनराजेंच धन्यवाद..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. उदयनराजे यांच्या नेतृत्वात आज (३ नोव्हेंबर) किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी आहेत,’ असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला. उदयनराजेंच्या …

Read More »

उदयनराजे भोसले म्हणाले, राज्यपालांची हकालपट्टी का झाली नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आज किल्ले रायगडावर उदयनराजे यांनी निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना …

Read More »

केंद्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर

हंसराज अहीर यांनी आज केंद्रीय मागासवर्ग अर्थात ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले. आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत …

Read More »

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

सुषमा अंधारे यांचा राज ठाकरेंवर टीकास्त्र, आमच्याकडे एक असा पठ्ठ्या..

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मागील काही दिवसांपासून प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने बंडखोर शिंदे गटावर सातत्याने टीकेची झोड उठविली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी आता मनसेकडे आपला निशाना वळवित थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ …

Read More »

बच्चन यांच्या दिवार चित्रपटाप्रमाणे त्यांच्या कपाळावर गद्दार असा शिक्का

शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवर उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, जे आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे लिहिले …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण …

Read More »

सीमावासिय परराज्यात जाण्यासाठी उत्सुक तर राज्य सरकार सीमा भागातील बांधवांच्या पाठीशी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील २८ गावांवर दावा सांगितल्यानंतर लगेच सोलापूर जिल्ह्यातील गावांवरही दावा सांगितला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांनी, नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी आणि गुजरातला लागून असलेल्या सीमावर्ती भागातील अनेक नागरीकांनी गुजरातमध्ये जाण्याबाबतची भूमिका मांडण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर विकासाची गंगा आमच्यापर्यत पोहोचत …

Read More »