राजकारण

नारायण राणे म्हणाले, मी उध्दव ठाकरेंना भेटणार…तर राऊतांना चपलेने मारतील संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी येऊन मला.. यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात कधीच राजकिय शत्रुत्व असल्याचे दिसून आले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सामना वर्तमानपत्रात आलेल्या लेखावरून नारायण राणे आणि संजय राऊत यांना गंभीर इशारा दिल्यानंतर मागील दोन दिवसांपासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, मोदी सरकारने कामगारांचे अधिकार व हक्क संपुष्टात आणले उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊन उभे केले. काँग्रेसने कामगारांच्या मदतीने भारताला एक सक्षम देश म्हणून उभा केले. या कामगारांसाठी काँग्रेस सरकारने अनेक कायदे करुन हक्क व अधिकार दिले पण मोदी सरकारने कामगार चळवळीचे अस्तित्व संपवण्याचे काम केले असून मालकधार्जिणे कायदे आणून कामगार …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचा सल्ला, मुख्यमंत्री भाजपाच्या कुटील डावाला बळी पडू नका मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा

महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे आणि भाजपाच्या कुटील डावाला बळी पडता कामा नये अशी भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे केलेल्या विधानाचा महेश …

Read More »

अतुल लोंढेचा सवाल, भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये अवैज्ञानिक विचारांची मांडणी कशासाठी? रांगोळीने दुष्टशक्ती येत नसेल तर कांचन गडकरी व कल्पना पांडेंना चीन, पाकिस्तानच्या सीमेवर पाठवा

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये इंडियन वुमेन्स काँग्रेसच्या चर्चासत्रात अवैज्ञानिक व श्रद्धेला खतपाणी घालणारी मांडणी दोन महिलांनी केली. कांचन गडकरी यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगितले तर भाजपा नेत्या कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने दुष्टशक्ती येत नाहीत असे सांगितले. रांगोळीने जर दुष्टशक्ती येत नसतील तर …

Read More »

शिंदे गटातील प्रवेशावरून संजय राऊत म्हणाले, मेंढर पकडायची अन्… नाशिकमधील ५० पदाधिकारी शिंदे गटात गेल्याच्या प्रश्नावर राऊतांचे उत्तर

उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे संघटना बांधणीच्या कामासाठी सध्या नाशिक दौऱ्यावर असतानाच आज ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार करत असलेली कामे लोकांना आवडत असल्याने कार्यकर्त्ये प्रवेश करत आहेत. त्यांना विश्वास वाटत असल्यानेच असे पक्षप्रवेश सोहळे पार पडत …

Read More »

त्या डिलीट केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण, जो तुम करते हो… चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

मागील काही दिवसांपासून आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरून नंतर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दर्ग्यात जाऊन दर्शन घेतल्याचा फोटो ट्विट करत टीका …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या सभे आधीच नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर

जानेवारी महिन्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहिर सभा होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तसेच सध्या नाशिकच्या दौऱ्यावर संजय राऊत आहेत. मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केला. यापूर्वी संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना १२ माजी नगरसेवकांनी प्रवेश शिंदे गटात प्रवेश …

Read More »

संजय राऊत यांचे राणेंना आव्हान, धमक्या देत असाल तर राजवस्त्र काढून या तुरुंगात टाकणार असल्याच्या नारायण राणेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांचा पलटवार

काल शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटातील नेते खासदार संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा दिला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणे यांनी वरील विधान केले. नारायण राणेंच्या या इशाऱ्याला आज …

Read More »

राज्यातील कुलगुरूंच्या बैठकीत झाली या विषयावर चर्चा विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे

विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी …

Read More »

अमित शाह यांनी जाहीर केली राम मंदीराची तारीख राहुल गांधी यांचे नाव घेत त्यांच्या जून्या टीकेचा संदर्भ देत तारीख जाहीर केली

देशातील जवळपास सर्वच लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपाने सातत्याने राम मंदीर उभारणीचा मुद्दा निर्माण करत लढविल्या. त्यानंतर मधल्या काळात कधी राम मंदीर उभारणीचा मुद्दा मागे ठेवला. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मस्जिद प्रकरणी अंतिम निकाल दिल्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर टीका करण्यास …

Read More »