राजकारण

हनुमान चालिसा म्हणणाऱ्यावर राष्ट्रद्रोह तर आदेशाचे पालन करणाऱ्यांवर वरंवटा कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे

हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. …

Read More »

गुप्तचर विभागाचा इशारा, बाहेरचे लोक येवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट पोलिसांच्या बैठकीत गुप्तचर विभागाची माहिती

एकाबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याचा विषय लावून धरला असतानाच आणि त्यासाठी ४ मे चा अल्टीमेटम दिलेला असताना यापार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातील लोक येवून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला दिली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पोलिस महासंचालकांना फोन, योग्य कारवाई करा गृहमंत्री गिलीप वळसे-पाटील यांनी बैठक घेतल्यानंतरची मोठी घडामोड

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस उच्च अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनद्वारे चर्चा …

Read More »

गुन्हा दाखल झाल्यावर इम्तियाज जलील म्हणाले की, फारचं साधी कलमं लावली कदाचित मुख्यमंत्र्यांना त्यांचा भाऊ असल्याने तसे वाटलं असेल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीकास्तर सोडलं. विशेषत: राज ठाकरेंवर दाखल गुन्ह्यामध्ये जी कलमं लावण्यात आली आहेत, त्या कलमांविषयी …

Read More »

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, बाळासाहेबांचे ऐकणार की, शरद पवारांचे ? पत्र लिहित हिंदू आपली ताकद काय ते राज्य सरकारला दाखवून देण्याचे आवाहन

औरंगाबादेतील सभेप्रकरणी पोलिसांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मनसैनिकांना आपल्यापुढील ध्येय धोरणाची जाणीव होण्यासाठी राज ठाकरे यांनी थेट हिंदूधर्मियांना मस्जिदीसमोरील भोंग्याच्याविरोधात मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवावी असे आवाहन करत त्यातून आपली ताकद दाखवून द्या असे सांगत भोंग्याप्रश्नी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलेले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

मनसेप्रमुख राज ठाकरेंवरील गुन्हे दाखल केल्यानंतर मनसे म्हणाली, संघर्ष… संदिप देशपांडे यांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत औरंगाबाद येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या मैदानावर आयोजित सभे दरम्यान राज ठाकरे यांनी ३ मे चा अल्टीमेटम दिला. मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेसाठी नियम व अटींसह परवानगी देण्यात आली. परंतु घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आयोजक संजय जेवरीकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. …

Read More »

औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर “हे” गुन्हे दाखल पोलिसांकडून अटकेची शक्यता

औरंगाबाद येथील सभे दरम्यान अचानक अजाण सुरु झाल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना विनंती करत आताच्या आता पोलिसानी तेथे जावे आणि त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा अशी विनंती केली. त्याचबरोबर यांना सरळ भाषेत सांगितलेले कळत नाही तर तर ह्याच्या आयला एकदा होवून जावूदेच अशी प्रक्षोभक भाषा वापरत सभेसाठी जमलेल्या समुदायाला …

Read More »

कायदा तोडणारा कोणीही असो राज्य सरकार कारवाई करेल राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी: नाना पटोले

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करेल, असे काँग्रेस …

Read More »

टिळकांचे खापर पणतू म्हणतात, समाधीचा दावा नाही पण स्मारकासाठी पैसे गोळा केले राज ठाकरेंच्या वक्तव्यावर केला खुलासा

नुकत्याच झालेल्या औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा खळबळजनक दावा करत आता त्यांच्याकडेही जातीय दृष्टीकोनातून पाहणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. मात्र राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक म्हणाले की, टिळकांच्या घरातील …

Read More »

फडणवीसांच्या दाव्याला राऊतांकडून अडवाणींच्या तोंडून उत्तर एनडीटीव्हीवरील मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करून दिले प्रत्युत्तर

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत भाजपाच्यावतीने मुंबईतील सोमय्या मैदानावर जाहीर सभा आयोजित केली. या सभेला संबोधित करताना भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मस्जिदचा ढाचा पाडताना मी स्वत: तेथे उपस्थित होतो. तसेच बदायु येथील तुरूंगातही होतो असा दावा करत त्यावेळी तुम्ही कोठे होतात असा सवाल शिवसेनेला करत बाबरी …

Read More »