राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत अल्टीमेटम दिला. तसेच राज्यातील हिंदूत्वाच्या मुद्यावरूनही आक्रमक भूमिका स्विकारण्यास सुरुवात केली. तसेच नुकताच अयोध्या दौराही राज ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र याच अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केलेली पुन्हा शिवसेनेने सव्याज परत करत त्यांचेच एक …
Read More »भोंग्याच्या संदर्भात लवकरच धोरण, अधिसूचना जारी होणार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मौलवी आणि राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात धोरण तयार कऱण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच पोलिस दलातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या संदर्भात पोलीस महासंचालक आणि मुंबई …
Read More »सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही हे डोक्यात ठेवून कामाला लागा आज महागाई इतकी वाढलीय याबाबत लोकांना सांगा...केंद्र सरकारची पोलखोल करा - जयंत पाटील
प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोकं मान्य करत नाही. त्यामुळे आपण लोकांशी बोला… आज महागाई इतकी वाढली आहे याबाबत लोकांना सांगा.. केंद्रसरकारची पोलखोल करा… या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही. हे डोक्यात ठेवून कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करा असे आवाहन राष्ट्रवादी …
Read More »कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… महागाईचे चटके कमी होणार का? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपरोधिक टोला
कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही …
Read More »अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करायचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची आघाडी सरकारवर टीका
समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे श्रेय घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने …
Read More »नाना पटोलेंचा टोला, राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली हे देवेंद्र फडणवीसच सांगतील राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांना बंदी घाला- नाना पटोले
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढलेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस …
Read More »अजित पवारांचा खोचक सवाल, अयोध्येला जाण्याचा बोभाटा का, आम्ही गेलो… राज ठाकरेंना लगावला टोला
पुण्यात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर उलट-सुलट तर्क-वितर्क लढविले जात असताना यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत खोचक सवाल केला. अहो भारतात कोणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्याला …
Read More »अखेर पुरंदरेंबाबत लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा, मला कोणीही… एका इंग्रजी साप्ताहीकाला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जाती-पातीतील राजकारणाला सुरुवात झाल्याचा आरोप करत त्यासाठी शरद पवारांनी सॉफ्ट टार्गेट म्हणून सातत्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवारांनीही जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकात पुरंदरेंचे नाव असून त्यास छत्रपती शिवाजी महाराजांची चुकीची माहिती दिल्याने आपण त्यांच्यावर टीका केल्याचे स्पष्ट केले. अखेर …
Read More »राज आणि आदित्यच्या अयोध्या दौऱ्यावर फडणवीसांचे वक्तव्य, जर कोणी… मंदीर निर्माण होत असल्याने तेथे कोणी जात असेल तर त्यात गैर काय
पुणे येथे हनुमान मंदीरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल महाआरती केल्यानंतर आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबादेतील जाहिर सभेसह जून महिन्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांना अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र हा अयोध्या दौरा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या आधीच हा दौरा …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भोंग्याचे गुजरात, उत्तर प्रदेशात काय झाले चौकशी करा म्हणा भोंग्यावरून लगावला टोला
मागील काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्याचा सातत्याने पुर्नरूच्चारही करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला असून …
Read More »
Marathi e-Batmya