राजकारण

नाना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी आता पुण्यातून पलायन करावे ईडीची भिती दाखवणाऱ्या भाजपाला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय हा महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीला धार्मिक रंग देणा-या व जनतेला ईडीची भिती दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीतील स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवून दिली अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

पराभवनानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, मताधिक्य जास्त नाही हुरळून जावू नका कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निकालाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये असा इशारा देत या निवडणुकीत भाजपाची मते वाढली …

Read More »

राज ठाकरेंच्या आधीच नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांकडून अमित शाहंना पत्र मस्जिदीवीरल भोगें काढण्यासंदर्भात लिहीले पत्र

गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंग हटविण्यासह मदरशांवर धाडी टाकण्याबाबत आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार असल्याचे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्यावेळी जाहीर केले होते. तसेच जर मस्जिदीवरील भोंगे नाही उतरवले तर मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावत हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे …

Read More »

ऊर्जा मंत्र्यांची स्पष्टोक्ती, कोल इंडियामुळे ही परिस्थिती पण ग्रामविकासचे पैसे मिळाले असते तर… वीज भारनियमनावरून ऊर्जामंत्री राऊत यांचा केंद्र आणि राज्यावर निशाणा

वीज भारनियमनाची परिस्थिती एकट्या महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरात आहे. देशाला कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडिया लिमिडेटच्या व्यवस्थापनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केला असून पण राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून ८००० हजार कोटी मिळाले असते तर आमची कुचंबना झाली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत राहणारे उत्तर भारतीय हेदेखील मुंबईकरच उत्तर भारतीय नागरिकांनीही महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे. उत्तर भारतीय संघाने कर्करोगग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांसाठी …

Read More »

माजी समेंलनाध्यक्ष सबनीस म्हणाले, मला तर संविधानाचा आवाज पवित्र राजकिय पक्षांच्या भोंगा विरूध्द आरती युध्दाला श्रीपाल सबनीसांचे उत्तर

नुकत्याच झालेल्या गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेत जर भोंगे काढले नाहीत तर मस्जिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला. त्यानंतर भाजपासह सर्वच राजकिय पक्षांकडून ऐनकेन प्रकारे राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले. यापार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले …

Read More »

राज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले, “त्या” रस्त्याने जायचा कार्यक्रम दिसतोय भोंगा विरूध्द हनुमान चालिसावरून शरद पवारांनी व्यक्त केले मत

मागील काही दिवसांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणात जातीय समीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. त्यास शरद पवार यांनीही मुद्देसुद्द उत्तर देत राज ठाकरे यांचे आरोप परतवून लावले. मात्र आता मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे आणि भाजपाची एकच भूमिका असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आगामी काळात मनसे …

Read More »

फडणवीसांच्या टीकेवर शरद पवार म्हणाले, प्रश्नाचे गांभीर्य नसणाऱ्याचं फारस गंभीर… मुंबईतल्या १३ व्या बाँम्बस्फोटावरून पवारांनी दिले उत्तर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जाती-पातीतील संघर्ष निर्माण झाला असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन आणि मतांचे राजकारण करण्यावरून भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या एकूण धार्मिक राजकारणाचा पडदा पाश करण्यासाठी सलग १४ ट्विट करत मुस्लिमधार्जिणे राजकारण पवार करत असल्याचा आरोप केला. …

Read More »

भाजपा नेते माधव भांडारी म्हणाले, काँग्रेसने आता तरी ती भावाना सोडावी पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रसेचा विरोध दुर्दैवी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे तीन मूर्ती भवन येथे उभारण्यात आलेल्या पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रेस पक्षाने केलेला विरोध हा त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सरंजामी वृत्तीचा निदर्शक आहे. देश बदलला आहे याची जाणीव ठेऊन काँग्रेस पक्षाने आता तरी भारत हा कोण्या एकट्याची जहागीर असल्याची भावना सोडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? कोळसा आयातीचा केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला भाजपच्या मित्रांच्या फायद्यासाठी

अखंड भारताचे स्वप्न पुढील १०-१५ वर्षात पूर्ण होईल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य नवे नसून आरएसएसचा तोच अजेंडा आहे. केंद्रात आरएसएसच्या विचाराचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरु आहे अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »