राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती. पण त्याची अंमलबजावणी केलीच नाही याची कबुली अर्थमंत्र्यांनी …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पंचसूत्रीच्या अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प
कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांनी अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाला बुस्टर …
Read More »निवडणूक घेण्याचे अधिकार आता अधिकृतरित्या राज्य सरकारकडे: राज्यपालांनी केली सही महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली
राज्यातील ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब होत नाही. तोपर्यंत राज्यातील निवडणूका घेण्याचे अधिकार राज्य सरकाने नुकतेच एक विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेत राज्यपालांच्या सहीसाठी पाठविले. त्यावर राज्यपालांनी आज सही करत ओबीसी आरक्षणाच्या लढाईतील मोठ्या अडथळ्याला दूर केले. राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री …
Read More »औरंगाबाद नामांतरावरून मुनगंटीवार थोरातांना म्हणाले मग, तुम्ही का नाव बदलले… विधानसभेत मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब यांच्या उपस्थित दिला इशारा
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहाचे लक्ष्य वेधण्यासाठी औचित्याच्या मुद्याद्वारे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा पुण्यस्मरणाचा आज दिवस आहे. त्यामुळे १९८८ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत झालेल्या विजयी सभेत औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्याची घोषणा केली. त्या विषयीचा प्रस्ताव आता तयार झाला असून सांसदीय कार्यमंत्री …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, आता बघा काय होते ११ तारखेला … पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पाटील यांचा इशारा
देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर अशा प्रमुख भाजपा नेत्यांनी आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर हल्ले करण्यास सुरूवात केली असून मैदानात …
Read More »फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले की, पंजाबमध्ये भाजपाची काय अवस्था भाजपाच्या नोटांपुढे आम्ही कमी केलो
भाजपाला शह देण्यासाठी आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत दिली.परंतु गतवेळीपेक्षा यावेळी गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. निकालानंतर गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात मोठा पक्ष ठरेल म्हणून काँग्रेसने कालच पत्र राजपाल्यांना पत्र दिले. तर शिवसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »त्या मंत्री उमेदवारावरून संजय राऊत झाले ट्रोलः मिळाली इतकी मते मिळाली अवघे १३७ मते
भाजपाला राजकिय टक्कर देण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून उत्तर प्रदेशात ४० ते ५० उमेदवार उभे करण्यात आले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत हे गेले होते. त्यावेळी गोरखपूर आणि लखनौ येथील जाहीर सभेत संजय राऊत यांनी केलेल्या भाषणात उमेदवार गौरव वर्मा हे विधान सभेत जाणार आणि …
Read More »निकालानंतर सोनिया गांधींनी बोलावली बैठक तर राहुल गांधीं म्हणाले… पंजाबमधील दारूण पराभमामुळे काँग्रेस गारठली
विधानसभा निवडणूकीला अवघे सात-आठ महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीने तोंड वर काढले. या दुफळीला शांत करता करता काँग्रेसच्या नेत्यांना नाकीनऊ आले. परंतु अखेर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर दुसऱ्याबाजूला ऐन निवडणूकीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी मुख्यमंत्री …
Read More »योगीं आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशातील ३७ वर्षाचा रेकॉर्ड मोडलाः दुसऱ्यांदा सत्ता ग्रहण मतांची टक्केवारीही वाढली
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत ३७ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढत पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ सरकारने आपला करिश्मा दाखवित दुसऱ्यांदा विजय मिळविला. त्यामुळे युपीत पुन्हा एकदा योगी आदित्यनाथचाच डंका वाजणार असल्याचे सिध्द झाले. त्याचबरोबर भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी मतमोजणीस …
Read More »निवडणूक निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले… ‘तो महाराष्ट्र भी तैयार है’ पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे - शरद पवार
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या उत्तर प्रदेशातील योगींचे सरकार जाणार असल्याचे भाकित करत पंजाब बद्दल सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य केले. मात्र आज या पाचही राज्यांचे निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, …
Read More »
Marathi e-Batmya