प्रकाश आंबेडकर यांची मागणी, महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करा

बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे. बौद्ध धम्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे, हा अन्याय आहे. महाबोधी महाविहार कायदा, १९४९ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हणाले की, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.१२) राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, बौद्ध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आणि या आंदोलनात बौद्ध समाज आणि सर्व न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *