प्रकाश आंबेडकर यांची मागणी, महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करा

बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे. बौद्ध धम्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे, हा अन्याय आहे. महाबोधी महाविहार कायदा, १९४९ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हणाले की, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.१२) राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, बौद्ध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आणि या आंदोलनात बौद्ध समाज आणि सर्व न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

About Editor

Check Also

शिवसेना उबाठाच्या त्या सहा बंडखोर खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले रात्री राजस्थान वरून मुंबईत येण्याची शक्यता

काल शिवसेना उबाठा पक्षाने बोलाविलेल्या बैठकीसाठी दिल्लीतील खासदारांना व्हिप जारी केल्यानंतरही ते सहा बंडखोर खासदारांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *