राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ पक्का अमेठीतूनच लढणार निवडणूक

देशातील लोकसभा निवडणूकांचा कालावधी आता जवळ आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची चर्चा जाहिरही करण्यात आली. यावेळी अमेठी आणि रायबरेलीत आणि वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मागील खेपेला अमेठीत भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या राहुल गांधी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र यावेळी राहुल गांधी हे आगामी निवडणूक अमेठीतून लढविणार असल्याची माहिती अमेठीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी दिली.

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने ६ मार्च रोजी सांगितले की पक्षाचे नेते राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवतील – या मतदारसंघाचे त्यांनी २००२ पासून अनेक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.

दिल्लीतील बैठकीनंतर परतलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल म्हणाले की, राहुल गांधी अमेठीतून पक्षाचे उमेदवार असतील आणि त्यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाईल.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी २००२ ते २०१९ पर्यंत संसदेत अमेठीचे प्रतिनिधित्व केले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला. ते आता केरळच्या वायनाडचे खासदार आहेत.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका, सत्ताधारी प्रधानांचं असं‌ समर्थन करत आहे जणू प्रधान निष्पाप मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसु पाहणाऱ्यांना धडा शिकवला गेला

जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, सत्ताधारी आमदार – खासदार धर्मेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *