Tag Archives: भाजपा

राज ठाकरे यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी केले कृत्य

दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी मनसे कार्यकर्त्यांचा आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०१८ साली मी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यावेळी कोणी आपल्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या …

Read More »

भाजपा महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे २० ऑक्टोबरला राज्यभर पिठलं भाकर आंदोलन फसवे पॅकेज देऊन शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार करणार

राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती …

Read More »

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग

दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे, हा विचार करून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, भाजपाने अस्मितांशी खेळत कार्पोरेट हिदूत्वाचा खेळ मांडला छत्रपती शिवाजी महाराज ‘कोटक’चे कधी झाले? सिद्धिविनायक ‘लोंबार्ड’ला विकला तर आचार्य अत्रेंचे निप्पॉन इंडिया एमएफ नामकरण!

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, तीन ‍जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनाझेशन निर्माण करणार ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा यांच्या संवर्धनासाठी बृहृत आराखडा

राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा (जलस्रोत) यांच्या संवर्धनासाठी बृहृत आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. या बृहृत आराखड्यामध्ये त्यांच जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक, फुटफॉल वाढवणे …

Read More »

आशिष शेलार यांचे मत, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक राहणे ही बाब आता केवळ लक्झरी नाही, तर काळाची गरज बनली आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांच्या …

Read More »

मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम घेणार छट पूजेच्या पूर्व तयारीचा आढावा मुंबई पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा

मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम उद्या मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या छट पूजा या सणाच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवार दुपारी १ वाजता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई परिसरातील विविध छट पूजा उत्सव …

Read More »

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. …

Read More »

ब्रम्हा चेल्लानी यांनी लडाखमधील परिस्थितीवरून दिला केंद्र सरकारला इशारा सोनम वांगचूक यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्हे उपस्थित करणे सोडा

भू-रणनीतीकार ब्रह्मा चेल्लानी यांनी सोमवारी लडाखमधील चालू अशांततेबद्दल केंद्र सरकारला इशारा दिला आणि यावर भर दिला की परिस्थितीला केवळ पोलिसिंगपेक्षा जास्त काही आवश्यक आहे. ब्रह्मा चेल्लानी म्हणाले की सरकारने मणिपूरमधील अशांततेला हाताळलेल्या धड्यातून धडा घेतला पाहिजे. एक्स X वरील एका सविस्तर पोस्टमध्ये ब्रह्मा चेल्लानी म्हणाले: “मणिपूरमधील अशांततेला सुरुवातीच्या संथ प्रतिसादामुळे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमित शाह आले पण शेतक-यांना मदतीबाबत शब्दही नाही सहकार क्षेत्रावर कब्जा मिळवण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना

महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर …

Read More »