Tag Archives: शिवसेना उबाठा

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांना इशारा, गुन्हा दाखल झाला पाहिजे, सजा झाली पाहिजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून केली टीका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक विषयक राजकारणाला गती आली आहे. मुंबईतील वरळीतील डोम मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील मतदार …

Read More »

दिवाळीचा गोडवा जपत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीज एकत्र भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंबिय एकोप्याने साजरा केला

महाराष्ट्राच्या राजकारणा ठाकरे कुंटुंबियाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या ठाकरे कुटुंबियांमधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे म्हणून राज्यातील ठाकरे प्रेमींची इच्छा होती. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकियदृष्ट्या एकत्र येत तशी घोषणाही केली. त्याचबरोबर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तशी अधिकृत …

Read More »

असीम सरोदे म्हणाले, शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार नाही उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवरील सुनावणी १२ नोव्हेंबर पासून सुरु होणार

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षाचे तुकडे झाले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्यास मोठा कालावधी निघुन गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरपासून सुणावनी सुरु …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा इशारा, विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा विरोधकांना इशारा

विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही! कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण …

Read More »

मुंबई, देवळाली, अहिल्यानगर, पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र …

Read More »

संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे देशाला दाखवून देणार

निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्या

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे.‌ विधानसभा निवडणुकीनंतर या चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर मोठा घोळ होऊ शकतो. ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य …

Read More »

आमदार अभ्यंकर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली शिक्षक भारतीच्या विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई शिक्षक मतदार संघात जून २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मा मुंबई उच्च न्यायालयाने सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून आरोपांची …

Read More »

रामदास कदम यांचा इशारा, बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून मागणी करणार तसेच अनिल परब यांना न्यायालयात खेचणार

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब यांनीही पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावरून रामदास कदम यांनी अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या विरोधात अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल …

Read More »

रामदास कदम यांच्या त्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर शिव्या देणाऱ्यांपेक्षा आर्शीवाद देणारे हात महत्वाचे

नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाचे नेते रामदास कदम यांनी नेहमीप्रमाणे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केला होता. त्या वक्तव्याला काही प्रसारमाध्यमातून प्रसिद्धीही चांगली मिळाली. मात्र रामदास कदम यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे …

Read More »