राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. …
Read More »अतुल सावे यांची माहिती, ‘महाज्योती’ आता यशाचा ‘ब्रँड’ · ‘महाज्योती’च्या गुणवंतांचे युपीएससी निकालात ‘शतक’ · भारतीय वन सेवा परीक्षेत आठ विद्यार्थ्यांची बाजी ·'महाज्योती'च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम
युपीएससी वन सेवा परीक्षेत ‘महाज्योती’च्या आठ विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि संस्थेने ओलांडलेला यशाचा ऐतिहासिक ‘शतकीय’ टप्पा, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून ‘महाज्योती’ आता केवळ एक प्रशिक्षण संस्था उरली नसून, ती ग्रामीण भागातील गुणवंतांना प्रशासनात हक्काचे स्थान मिळवून देणारा एक सक्षम ‘ब्रँड’ बनली आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले. पुढे …
Read More »अतुल सावे यांचे आदेश, दिव्यांग कर्ज योजनेची मर्यादा वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करा ओबीसी विभागाच्या व्याज परतावा कर्ज योजनेच्या धर्तीवर योजना राबवावी
दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज योजनांची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे. राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करून इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या व्याज परतावा योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री …
Read More »मंत्री अतुल सावे यांची माहिती, भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या अत्याचार प्रतिबंध व तक्रार निवारणावर भर
राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावर समित्यांच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे …
Read More »अतुल सावे यांची माहिती, दिव्यांग कल्याण विभागाची जिल्हास्तरावरील यंत्रणा सक्षम करणार दिव्यांग कल्याण विभागाशी संबधित प्रश्नावर विधानसभेत उत्तर देताना दिली माहिती
राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित वेतन आणि अनुदान प्रक्रियेत गैरव्यवहार होवू नये यासाठी शासनाने सखोल तपासणी सुरू केली असून, ज्या संस्थांची कागदपत्रे व प्रक्रिया स्पष्ट आहेत, त्यांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. राज्यात जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची …
Read More »अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत ‘विजाभज’ आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित …
Read More »एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला, संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यावर जलिल यांचे आरोप
छत्रपती संभाजी नगरातील बायजीपुरा जिन्सी भागात महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी गेलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी इम्तियाझ जलील यांना वाहनातून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्तियाज जलील यांनी या कारणामागे भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे असल्याचा …
Read More »इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन १ ली ते १० वी पर्यंतच्या शाळांना विभागाचे आवाहन
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,ओबीसींवर अन्याय होणार नाही; खोट्या नोंदी नकोच चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास आक्षेप
ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे. पण, तसे काही होणार नाही. कुणबी नोंदी आहेत,त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र, कुणबी नातेसंबंध, ग्रामसमिती, तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहेत. वंशावळ जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल. फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची …
Read More »अतुल सावे यांची माहिती, परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ अशी होती. ही मुदत वाढवून ६ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन …
Read More »
Marathi e-Batmya