Tag Archives: काँग्रेस

पंतप्रधान मोदी यांची सवाल, राहुल गांधी यांनी अंबानी, अदानीवरील टीका अचानक का थांबवली?

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षाने अंबानी आणि अदानी यांच्यावरील कडवट टीका थांबवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध भाजपा गेल्या पाच वर्षांत खोटे आख्यान पसरवणाऱ्या ‘पाच उद्योगपतींची’ नावे सांगून न थांबता फक्त भाषणबाजी केली अशी टीकाही पंतप्रधान …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६०.१९ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.१९% मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या ९३ मतदारसंघांमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. आसाममध्ये सर्वाधिक ७४.८६% मतदान झाले, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ७३.९३%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी ५३.६३% मतदान झाले, बिहारमध्ये ५६.०१% इतके चांगले मतदान झाले. काँग्रेस नेते राहुल …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची खोचक टीका, मोदी ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २००…

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पाहता ही गोष्ट त्यांच्या सुद्धा लक्षात आली आहे. मोदी कार्ड महाराष्ट्रात चालेल, अशी अशा भाजपवाले बाळगून होते. पण ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे. …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, …ITCODE Infotech कंपनीवर कडक कारवाई करा

मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्या करु लागल्या आहेत.ITCODE Infotech या कंपनीने चक्क मराठी लोकांनी अर्ज करु नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले. भाजपाचे सरकार आल्यापासून असा मराठीद्वेष उफाळून आला आहे, अशा …

Read More »

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आज अखेर माजी आमदार नसीम खान यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे सांगत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रिय होत …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची टीका,…म्हणून नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लिम, पाकिस्तानची भाषा

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी व भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार व आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाला उज्वल निकम यांचे प्रत्युत्तर, माझ्या पोतडीत….

कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या दहशतवादी अजमल कसाबने नव्हे तर आरएसएसशी संबंधित असलेल्या एका पोलिसाने केल्याचा आरोप महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय नामदेवराव वडेट्टीवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांचा उल्लेख करताना उत्तर …

Read More »

पुरीच्या काँग्रेस उमेदवार सुचरिता मोहंती यांची लोकसभा निवडणूकीतून माघार

सुरत आणि इंदूरने भाजपाच्या विजयाचा श्री गणेश (विजय) ची सुरुवात केली आहे… मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की आम्ही स्वतःसाठी ठेवलेले ४००-प्लस (४०० पार) चे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहोत, असा लंगडा युक्तीवाद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच बिहारमधील सरण येथे केला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानंतर सुरतमध्ये भाजपाने बिनविरोध विजय …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, २५ वर्षात एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप नाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही भ्रष्टाचार हटविण्याचा संकल्प करतो, तेव्हा इंडी आघाडीचे लोक भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी मोर्चे काढतात. येत्या पाच वर्षात अशा सर्व भ्रष्ट लोकांवर वेगाने कडक कारवाई केली जाईल, आणि भ्रष्टाचार खणून काढला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »