सोलापूर शहरातील काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे आज प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी काही मित्रांसोबत गेले होते. तेथे सकाळी गंगा नदीत स्थान करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर महेश कोठे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच महेश कोठे (वय-६०) यांचे निधन झाले. …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल,… मुंबईकरांच्या आरोग्यासाठी निधी नाही? मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवून बीएमसी रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने पुर्ववत करा
बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची १२० कोटी रुपयांची बिले सरकारने थकवल्याने औषध पुरवठा थांबवण्यात आल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. बीएमसीकडे अथवा राज्य सरकारकडे पैसे नाहीत हे पटणारे नाही. जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र मुंबईकरांच्या आरोग्यासाठी पैसा नाही का? असा संतप्त सवाल करत मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ …
Read More »राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ व्यापक जनसंपर्क अभियान
भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून …
Read More »राऊत यांच्या वक्तव्यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या, तर निवडणुकीचा निर्णय काँग्रेसही घेईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त संधी मिळावी ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले. विधानसभेला मुंबईत काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती पण कमी जागा मिळाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त संधी मिळावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे, या भावना पक्षश्रेष्ठींना कळवू व पक्षाचे वरिष्ठ नेते …
Read More »विजय वडेट्टीवार यांची भूमिका, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू अन्यथा… स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीवरून संजय राऊत यांच्या मतानंतर पुन्हा व्यक्त केली भूमिका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई ते महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहिर केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांनीही यासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कदाचित ते त्यांचे स्वतःचे …
Read More »राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर सावरकर यांच्या पणतूने दाखल केली होती याचिका
हिंदुत्वाचे प्रतीक विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी पुण्यातील विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर झाल्यानंतर न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खासदार/आमदार न्यायालयाने गांधी यांचा जामीन अर्ज २५,००० रुपयांच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल, सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? शाळांमधील मुलींची सुरक्षा वाऱ्यावरच, राज्यातील शाळांमध्ये 'सखी सावित्री' समिती पुन्हा कार्यान्वित करा
भाजपा युती सरकारने राज्यातील शाळांमध्ये मुलींची सुरक्षा तर वाऱ्यावरच सोडली आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत चेंजिंग रूममध्ये मुलींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना स्टाफमधील एक व्यक्ती पकडला गेला. ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. बदलापूरच्या शाळेतील घटनेप्रमाणेच या घटनेतही शाळेतील कर्मचारीच आरोपी आहे. सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? असा संतप्त सवाल मुंबई …
Read More »आता राजघाटावर डॉ मनमोहन सिंग याचे नव्हे तर प्रणव मुखर्जी यांचे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तसे पत्र शर्मिष्ठा मुखर्जी यांना दिले
केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची समाधी उभारण्यासाठी “राष्ट्रीय स्मृती” संकुलात (राजघाट परिसराचा एक भाग) एक नियुक्त जागा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हिने आज त्यांना शहरी व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेले पत्र शेअर केले आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि या …
Read More »दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला निकाल
दिल्लीत ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि तीन दिवसांनी अर्थात ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप), त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची राजकिय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या दमदार कामगिरीनंतर आणि काही महिन्यांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा …
Read More »भाजपाचे रमेश बिधुरी यांचे प्रियांका गांधी-वड्रा यांच्या अनुषंगाने आक्षेपार्ह विधान काँग्रेसकडून रमेश बिधुरी यांच्यावर टीकेचा भडीमार
दिल्लीच्या कालकाजी येथील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रविवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यास येथील रस्ते काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत करू असे आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले आहे. “लालू यादव यांनी एकेकाळी प्रसिद्ध असा दावा केला होता की ते बिहारचे रस्ते …
Read More »
Marathi e-Batmya