मणिपूर येथे मागील ४५ दिवस सतत दंगली होत आहेत. केंद्र सरकार ज्याप्रमाणे मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांना पाहत आहे त्यातून तिथल्या लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्याने आम्ही या देशाचे नागरिक आहोत का? असा प्रश्न पत्राद्वारे केला. लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना असे वाटत असेल तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल? देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जायचे तिथे जावे, …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, ते अजूनही भाषणच ठोकतायत..
भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांचं दुकान आम्ही का बंद केलं? याचं कारणही देवेंद्र …
Read More »उध्दव ठाकरे यांचे आव्हान, रशिया-युक्रेन युध्द थांबविल्याच्या भाकडकथा सांगता मग मणिपूर… पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधला निशाना
जर्मनीत हिटलरही सत्तेत आला होता. त्यानेही सुरुवातीला सर्व प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवले. जेणेकरून त्याच्या विरोधात बातम्या येऊ नये यासाठी. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही सुरु असून सध्या जे काही सुरु आहे तो प्रकार सत्तेची मस्ती आहे, हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे तो फोडायला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये …
Read More »संजय राऊत म्हणाले,…तर २४ तासात देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे शिवसेनेत…
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे, उपनेते शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी उधाण आले. या घटनेचा धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हीही उद्या सत्तेत आल्यानंतर ईडी-सीबीआयचा वापर सुरु केल्यानंतर २४ तासात देवेंद्र फडणवीस …
Read More »आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाला आव्हान, ….तर मी काहीही हरायला तयार
२० जून हा जागतिक खोके दिन आहे. कारण ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच आम्ही जे मुंबईत काम केलय तसंच काम केल्याचं प्रेझेन्टेशन शिंदे गटातील कोणत्याही मंत्र्याने द्यावे मी काहीही हारायला तयार असल्याचे आव्हाही …
Read More »सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती,… फारसे मनावर घेऊ नका
मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल,… पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करतेय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगतानाच यावर प्रकाश टाकणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले आहे. …
Read More »सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार
केंद्र व राज्य सरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान मरीन ड्राईव्ह …
Read More »अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न
गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका …
Read More »मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊस दर नियंत्रण समिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya